घरमनोरंजन#MeTooचा जाळ लावून तनुश्री निघाली अमेरिकेला

#MeTooचा जाळ लावून तनुश्री निघाली अमेरिकेला

Subscribe

२००८ साली 'हॉर्न ओके' या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी नाना पाटेकर यांनी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भारतात १० वर्षांनी परतल्यानंतर तनुश्रीने पुन्हा एकदा केला आणि सगळे प्रकरण उकरुन काढले. या शिवाय तिने २००५ साली चॉकलेट या सिनेमावेळी दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी मला कपडे काढून अभिनेता इरफान खान समोर नाचायला लावल्याचा आरोप केला होता.

भारतात #MeToo चळवळीची सुरुवात तनुश्री दत्ताने केली. नाना पाटेकर यांनी माझ्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने लावला होता. त्यानंतर अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आणल्या होत्या. पण ज्या अभिनेत्रीने याची सुरुवात केली. ती अभिनेत्रीने तिच्या बॅगा भरल्या असून ती परतीच्या प्रवासाला निघाली आहे. तनुश्रीचा मुंबई दौरा संपूर्ण झाला असून मी टून चा जाळ लावून तनुश्री न्यूजर्सीला परतली आहे. तिने या संदर्भात मिड- डेला एक मुलाखत देखील दिली आहे.

न्याय घेताच परतली तनुश्री?

२००८ साली ‘हॉर्न ओके’ या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी नाना पाटेकर यांनी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भारतात १० वर्षांनी परतल्यानंतर तनुश्रीने पुन्हा एकदा केला आणि सगळे प्रकरण उकरुन काढले. या शिवाय तिने २००५ साली चॉकलेट या सिनेमावेळी दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी मला कपडे काढून अभिनेता इरफान खान समोर नाचायला लावल्याचा आरोप केला होता. तिच्या या आरोपानंतर अनेक अभिनेत्रींनी असाच प्रकार त्यांच्यासोबत झाल्याचा आरोप केला होता. न्यायाची अपेक्षा करणारी तनुश्री आता मात्र न्यू जर्सीला परतली आहे. तिने मिड डे ला न्यू जर्सीला परतण्याच्या प्रश्नावर तिने सांगितले, ‘ माझ्यामुळे अन्य महिलांना बोलण्याची ताकद मिळाली. मला एक दिवस न्याय मिळेल. मुळात मी भारतात एक महिन्यासाठी आले होते. पण आता पाच महिने झाले आहेत. पण मी सुरु केलेल्या चळवळीमुळे एक बदल घडला’ असे ती म्हणाली. पण इतरांसाठी मात्र #MeTooचे वादळ सुरु करुन खऱ्या खोट्याचा निवाडा होण्याआधी तनुश्री न्याय न घेताच न्यू जर्सीला परतली, असा सूर उमटत आहे.

- Advertisement -
वाचा- अखेर तनुश्री प्रकरणी नाना पाटेकरांचं महिला आयोगासमोर स्पष्टीकरण!

माझे भविष्य अमेरिकेतच

तनुश्रीने दिलेल्या मुलाखतीत तिने तिचे भविष्य न्यू जर्सीमध्ये असल्याचे सांगितले. त्यामुळे परत जात असल्याचे सांगितले. ती मुंबईत आल्यानंतर ती सिनेमांमध्ये काम करण्यासाठी परतल्याचे अनेकांनी म्हटले होते. पण प्रसारमाध्यमांना नाना पाटेकर यांच्या संदर्भात मुलाखत देण्याऐवजी तिने काहीच काम केले नाही.

वाचा-तनुश्री दत्ताने केला राखी सावंतवर मानहानीचा दावा

राखी खरे बोलत होती का?

तनुश्रीच्या या भांडणात राखी सावंतदेखील होती. हॉर्न ओके प्लीज या सिनेमातील गाण्याची रिप्लेसमेंट राखी सावंतने केली होती. ती मुंबईत का परतली याचे कारण राखीने सांगितले होते. पाहा तो व्हिडिओ

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -