‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील एका कलाकाराच्या लग्नाला अंजली बाई आणि राणादाने हजेरी लावली असून त्याच्यासोबतचा लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअरदेखील केला आहे. छोट्या पडद्यावरील कोल्हापूरच्या गायकवाड कुटुंबाची गोष्ट सांगणारी मालिका म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’. यामध्ये रणविजय उर्फ राणादा आणि पाठक बाई म्हणजे अंजली यांच्या प्रेमापासून ते लग्न आणि नंतरच्या अनेक अडचणींमध्ये राणादाच्या सोबत असणारा खास मित्र बरकत याच्या लग्नात त्यांनी हजेरी लावली होती. बरकत उर्फ अमोल नाईक याचा नुकताच पूजा हिच्यासोबत विवाह पार पडला. त्यांच्या लग्नात अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी या कलाकारांनी उपस्थिती दर्शवली.
बरकतची भूमिका पसंतीस उतरली
गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ सुरु असलेल्या तुझ्यात जीव रंगला मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या राणादाचा खुपच जवळचा मित्र बरकत हा सुरुवातीपासूनच मालिकेत आहे. अंजली आणि राणाच्या प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात त्याने मित्र म्हणून राणाची साथ दिली आहे. राणादाचे बरकत आणि त्याचा लाडका बैल साहेबराव हे दोनच खास मित्र आहेत. त्यामुळेच की काय रिअल लाईफमध्येही राणाने त्याचा खास दोस्त असलेल्या अमोल नाईकच्या लग्नाला हजेरी लावली आहे.
हेही वाचा –
असं काय झालं की, ‘महेश भट्ट यांनी कंगनाला चप्पल फेकून मारली’