घरमनोरंजन'या' चित्रपटातून करतेय कृतिका बॉलिवूडमध्ये एन्ट्री!

‘या’ चित्रपटातून करतेय कृतिका बॉलिवूडमध्ये एन्ट्री!

Subscribe

कृतिका कामरा ‘कितनी मोहब्बत है’, ‘कुछ तो लोग कहेंगे’  या मालिकेतून घराघरात पोहोचली. लवकरच ती नितीन कक्कड निर्मित ‘मित्रो’ या चित्रपटात झळकणार आहे.

हिंदी मालिकांमधून काम करणारे अनेक कलाकार पुढे बॉलिवूडमध्ये पदार्पण करतात. अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. बॉलिवूडमध्ये पदार्पण करावं अशी अनेकांची इच्छा असते. मात्र ही संधी सगळ्यांनाच मिळते असं नाही. नुकतीच छोट्या पडद्यावर झळकलेली अभिनेत्री कृतिका कामराने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे.

कृतिका कामरा ‘कितनी मोहब्बत है’, ‘कुछ तो लोग कहेंगे’  या मालिकेतून ती घराघारत पोहोचली. लवकरच ती नितीन कक्कड निर्मित ‘मित्रो’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता जॅकी भगनानी मुख्य भूमिका साकारणार आहे.

- Advertisement -

‘टाईम्स नाऊ’शी बोलताना कृतिका म्हणाली, ‘१२ वर्षांनंतर मला मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वीही माझ्याकडे दोन चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. या चित्रपटांसाठी मी होकार दिला होता. पण काही कारणांमुळे मला या चित्रपटांतून माघार घ्यावी लागली होती. मात्र ‘मित्रो’ या चित्रपटाद्वारे मी खऱ्या अर्थांने बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. आता माझ्या बॉलिवूडच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -