घरफिचर्ससंमेलन आणि राजकारण

संमेलन आणि राजकारण

Subscribe

सध्या सरकारच्या कोणत्याही भूमिकेवरून थेट लोकशाहीविरोधी कटकारस्थान, संविधानविरोधी कटकारस्थान, हुकूमशाहीसदृश्य निर्णय असे निष्कर्ष काढून समाजात सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू असतो, त्यात संमेलनाध्यक्ष यांची भर पडली. त्यामुळे प्राध्यापक ढेरे यांनी मांडलेली भूमिका अस्वीकार्य म्हणता येणार नाही. फादर दिब्रिटो संमेलनाध्यक्ष आहेत त्यांनी प्रकृती अस्वस्थ या कारणामुळे ग्रंथ दिंडीला उपस्थिती न लावता थेट अध्यक्ष भाषणाच्या कार्यक्रमात उपस्थित राहणे पसंत केले. ही कृती त्यांच्या वर्तणुकीवर संशय व्यक्त करणारी वाटते. याचवेळी दुसरीकडे मात्र वसईतील 33 चर्चमधील फादर यांचा समूह संमेलनाच्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी केलेले विचार प्रदर्शन हा विरोधाभास आहे.

93 व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांनी मांडलेले विचार जरी साहित्यसमृद्ध वाटत असले तरी प्रत्यक्षात त्यांनी त्यांच्या विचारांना विशिष्ट दिशा देऊन अध्यक्षीय भाषणाचा समारोप केला. सध्या हुकूमशाही सुरू असल्याचे मतप्रदर्शन त्यांनी केले. त्यावर माजी संमेलनाध्यक्ष प्रा.अरुणा ढेरे यांनी आक्षेप घेतला. सध्या सरकारच्या कोणत्याही भूमिकेवरून थेट लोकशाहीविरोधी कटकारस्थान, संविधानविरोधी कटकारस्थान, हुकूमशाहीसदृश्य निर्णय असे निष्कर्ष काढून समाजात सरकारच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू असतो, त्यात संमेलनाध्यक्ष यांची भर पडली. त्यामुळे प्राध्यापक ढेरे यांनी मांडलेली भूमिका अस्वीकार्य म्हणता येणार नाही. फादर दिब्रिटो संमेलनाध्यक्ष आहेत त्यांनी प्रकृती अस्वस्थ या कारणामुळे ग्रंथ दिंडीला उपस्थिती न लावता थेट अध्यक्ष भाषणाच्या कार्यक्रमात उपस्थित राहणे पसंत केले. ही कृती त्यांच्या वर्तणुकीवर संशय व्यक्त करणारी वाटते. याचवेळी दुसरीकडे मात्र वसईतील 33 चर्चमधील फादर यांचा समूह संमेलनाच्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी केलेले प्रदर्शन हा विरोधाभास आहे.

जेव्हा करण्यासारखे पुष्कळ असते, तेवढी क्षमताही असते; मात्र प्रत्यक्षात भरीव असे काहीच केले जात नाही, उलट पुष्कळ काही केल्याचा आव आणला जातो, तेव्हा विषयाचा गाभा उपेक्षित राहतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची गेल्या काही वर्षांमध्ये अशी अवस्था झाल्याचे चित्र आहे, जे अर्थातच दुर्दैवी आहे. धाराशिव येथे 93 वे संमेलन झाले. यंदाच्या संमेलनात सर्व निष्ठा येशूचरणी अर्पित केलेले फ्रान्सिस दिब्रिटो संमेलनाध्यक्षांच्या आसंदीमध्ये बसत असल्याचे चित्र पाहण्याची वेळ सारस्वतांवर ओढवली. त्यामुळे यापुढे हिंदू धर्माचे प्रचारक साहित्यिक यांनाही संमेलनाध्यक्ष पदी बसवल्यास विरोध होणार नाही, हे त्यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.

- Advertisement -

फ्रान्सिस दिब्रिटो यांनी त्यांची अखिल भारतीय स्तरावरच्या संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून निवड झाल्याने या निवडीच्या विरोधात उठवलेल्या आवाजाची म्हणावीशी नोंद घेतली गेली नाही. ‘या शुभ्र वस्त्रा वृता’ असे म्हणून विद्येची देवता असणार्‍या सरस्वतीदेवीची आराधना केली जाते. मात्र, शुभ्र वस्त्र म्हणजे ख्रिस्ती धर्मोपदेशकांचा झगा असे समीकरण भविष्यात जुळेल, याची कोणी कल्पनाही केली नसावी. दिब्रिटो यांच्यासह वसई परिसरातील 35 चर्चमधून पाद्री संमेलनाला उपस्थित राहिले. त्यांच्या निवासाची आणि प्रार्थनेची सोय एका विद्यालयात करण्यात आली. वास्तविक या जथ्याला संमेलनाच्या स्वागताध्यक्षांनी पायघड्या घालणे अपेक्षित नव्हते.

याचे कारण गेल्या काही वर्षांमध्ये संमेलनाच्या भरकटलेल्या दिशेमध्ये आहे. प्रतिवर्षी मोठा गाजावाजा करून संमेलन भरवले जाते; पण त्या तुलनेत संमेलनाच्या माध्यमातून होणारे कार्य नगण्यच असते. वर्षानुवर्षे संमेलने भरवूनही मराठी भाषेसमोरची आव्हाने आज जशीच्या तशीच असून उलट त्यात भरच पडत आहे. प्रत्येक वर्षीच्या संमेलनामध्ये मागील वर्षभरामध्ये मराठीच्या संवर्धनाच्या दृष्टीने केलेल्या कार्याचा वस्तुनिष्ठ लेखाजोखा मांडला, तर संमेलनाची फलनिष्पत्ती लक्षात येऊ शकते; पण फलनिष्पत्तीविषयीच्या चिंतनाची संमेलनामध्ये वजावटच केल्याचे दिसून येते. साहित्य संमेलन भाषाविषयक भरीव कार्याविषयी लक्षात राहण्याऐवजी संमेलनाच्या अनुषंगाने होणार्‍या वादांमुळे लक्षात राहत आहे. वास्तविक साहित्य संमेलन एक मोठे आणि वलयांकित व्यासपीठ आहे; मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या संमेलनाचा दर्जा खालावून त्याला एक सोपस्काराचे रूप आले आहे.

- Advertisement -

म्हणून तर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले, प्रतिभावान कवी आणि लेखक असलेले महान क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी काँग्रेसकडून गलिच्छ राजकारण केले गेले, तेव्हा त्याविषयी निषेधाचा सूर उमटवण्याची चर्चाही या संमेलनाच्या धुरिणांमध्ये दिसून आली नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर राजकीयदृष्ठ्या एक महान नेते होतेच; पण त्याही पलीकडे एक उच्चकोटीचे लेखक, प्रतिभावान कवी होते. त्यांच्या कविता आणि त्यांची प्रेरक वाक्ये आजही वाचकांच्या मनात देशभक्तीचे तरंग निर्माण करतात. अशा व्यक्तीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात असताना साहित्यिक या नात्याने तरी काँग्रेसींच्या वर्तनाचा संमेलनामध्ये धिक्कार होणे आवश्यक आहे.

इंग्रजी भाषेचे आक्रमण, मराठी शाळांना लागलेली गळती, क्षीण होत चाललेला भाषाभिमान आणि मराठीविषयी वाढत असलेला न्यूनगंड अशी कितीतरी आव्हाने आज मराठीसमोर आहेत. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून या संकटांचा सामना करण्यासाठी रणनीती ठरवणे, उपाययोजना काढणे, त्या राबवतांना येणार्‍या अडचणींवर मार्ग काढणे, त्यादृष्टीने चिंतन होणे अपेक्षित आहे; मात्र कागदोपत्री ठराव करण्याच्या पलीकडे संमेलनात ठोस काही घडताना दिसत नाही. संमेलनामध्ये अनेकदा सीमाप्रश्नी ठराव संमत झाले आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक या राज्यांमधील सीमाप्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्याने संमेलनाच्या माध्यमातून त्याचे निराकरण होईल, असे नाही; पण या संदर्भात प्रभावी जनमत तर नक्कीच निर्माण केले जाऊ शकते; मात्र दुर्दैवाने या ठरावाला तितके वजन प्राप्त झालेले नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याविषयी प्रतिवर्षी संमेलनामध्ये परिसंवाद आणि विविध व्याख्यानांमधून या मागणीचा पुनरुच्चार केला जातो.

तसा तो केलाही जावा; पण मराठीविषयी मानाचा दर्जा मराठीजनांच्या मनात निर्माण करण्याच्या प्रयत्नांविषयीचे काय? भविष्यात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेलही; पण त्यामुळे भाषेचा होत असलेला र्‍हास थांबणार आहे का? साहित्य संमेलनाकडून खरी अपेक्षा आहे ती ही ! आज मराठीच्या संवर्धनाचा नाही, तर अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. भाषाशुद्धीकरण, प्रमाण भाषेचा आग्रह, दर्जेदार साहित्यनिर्मिती हे महत्त्वाचे विषय आहेतच; पण तो पुढचा टप्पा झाला. आज एकीकडे दक्षिणेकडील राज्यांमध्ये टोकाचा प्रादेशिक भाषावाद पाहायला मिळतो, तर महाराष्ट्रामध्ये भाषासंवर्धनाविषयी कमालीची अनास्था दिसून येते. याचा सुवर्णमध्य गाठण्याची आवश्यकता आहे. याचे दायित्व मराठी साहित्य परिषद, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि तत्सम संस्थांकडे अधिक आहे; म्हणूनच या व्यासपीठाने ‘इव्हेंट’गिरी मधून बाहेर पडून जनमानसांत जाऊन काम करणे आवश्यक आहे.

आज घटत्या वाचकसंख्येचाही ज्वलंत प्रश्न भाषेपुढे आहे. यामुळे अनेक प्रकाशकही चिंतीत आहेत. मराठीची आवड निर्माण झाली, तर त्या भाषेतील साहित्य वाचले जाईल. ही गोडी निर्माण करण्याचे दायित्व सामूहिक आहे. मराठी रक्षणासाठी भव्य दिव्यच करायला पाहिजे असे नाही. मराठीविषयी तरुणांमध्ये असलेली न्यूनगंडाची भावना दूर करण्यासाठी घराघरांमधूनच प्रयत्न झाले, तर संमेलनाच्या उद्देशपूर्तीला साहाय्य होईल. साहित्य संमेलनाला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. या संमेलनाने पूर्वीही मूलभूत कार्य केले आहे. आजही हे व्यासपीठ मराठीचा र्‍हास रोखण्यासाठी मोलाची भूमिका बजावू शकते; मात्र त्यासाठी तत्त्व आणि दृष्टीकोन यांमध्ये जे दोष निर्माण झाले आहेत, ते दूर करायला हवेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुवर्ण महोत्सवाच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यादृष्टीने मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी प्रामाणिक प्रयत्न होणे अपेक्षित आहेत. तसे प्रयत्न सारस्वतांकडून होतील, ही अपेक्षा !

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -