स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना शक्य तितका देशवासियांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आरोग्यावर सर्वाधिक भर देत नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन या योजनेची घोषणा केली. देशात कोरोनावरील लसीवर सुरु असलेल्या संशोधनाची माहिती देत नागरिकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. श्रीराम मंदिर विवाद सुरु झाल्यानंतर लाल किल्ल्यावरून श्रीराम मंदिराचा उल्लेख कुणी केला नाही. कारण या ठिकाणावरून श्रीराम मंदिराविषयी बोलणे येथे जातीयवादी ठरवले जात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मोदी यांच्या कालखंडात श्रीराम मंदिराचा विषय सर्वमान्य बनला, त्यामुळेच मोदी यांना हे शक्य झाले. पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून शेजारील देशांना अनोखे आवाहन केले, ज्याचा कुणाला अंदाज नव्हता, ते म्हणाले आपल्या देशाची भूमी शेजारील देशांना जोडली म्हणून आपण शेजारी होत नाहीत तर त्यांच्याशी आपली मने जुळलेली असतात. तेंव्हा दहशतवाद आणि विस्तारवाद याच्याशी एकत्र होऊन लढुया, अशा शब्दांत त्यांनी शेजारील देशांना आवाहन केले. त्याचवेळी एलओसी आणि एलएसीशी हे दोन शब्द एकत्र बोलून पंतप्रधानांनी पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांना कडक संदेश दिला. भारत ७४व्या स्वातंत्र्यदिनी विस्तारवादी देशांसमोर एक आव्हान बनला आहे, लडाकमध्ये भारतीय सैन्यांनी ते दाखवून दिले आहे. अशा प्रकारे भारत त्यांना पूर्ण निर्धाराने उत्तरे देत आहे, असे पंतप्रधानांनी ठणकावले. अशा प्रकारे पंतप्रधानांनी या माध्यमातून एकीकडे बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि श्रीलंका या देशांना चीनपासून सावध राहण्याचे संकेत दिले, तसेच चीन-पाकिस्तानला दम भरला.
पंतप्रधानांनी भाषणात स्वावलं
आपल्याला फक्त आपला अनोखा आयडी डॉक्टरांना सांगावा लागेल, त्याद्वारे डॉक्टर तुमच्या सर्व वैद्यकीय नोंदी कुठूनही पाहू शकतील. ही योजना देशातील नागरिक आणि रुग्णालयांना ऐच्छिक असेल. म्हणजेच या योजनेत सामील व्हावे की नाही याविषयी ते स्वत: निर्णय घेतील. दुर्गम भागातील खेड्यात राहणार्या लोकांना या योजनेचा सर्वाधिक फायदा होईल. जे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात न जाता थेट डॉक्टरांचा सल्ला घेवू शकतील. संपूर्ण देशाची डिजिटल आरोग्य व्यवस्था निर्माण करणे हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. हि योजना भारताच्या आरोग्य क्षेत्रात नवीन क्रांती घडवून आणणार असल्याचा विश्वास पंतप्रधांना वाटत आहे.
सध्या देशात कोरोनावर तीन लसी वेगवेगळ्या क्लिनिकल चाचणीच्या टप्प्यात आहेत. पहिल्या लसीचे नाव आहे को-व्हॅक्सिन (को-व्हॅक्सीन), हि लस भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांनी तयार केली आहे. या लसीची पहिली चाचणी देशातील १२ केंद्रांवर पूर्ण झाली असून दुसर्या टप्प्यातील चाचण्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहेत. दुसर्या लसीचे नाव आहे झिककोव्ह-डी (झायकोव्ह-डी), ड्रग फार्मा कंपनी ऑफ इंडिया (झाइडस कॅडिला) यांनी ६ ऑगस्टपासून या लसीच्या दुसर्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या आहेत. तर तिसर्या लसीचे नाव आहे कोवी-शील्ड (कोवी-शील्ड), ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधनावर तयार करण्यात आलेल्या या लसीवर पुणे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे कार्यरत आहे. या लसीच्या तिसर्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या सुरू झाल्या आहेत. या वर्षाच्या अखेरीस ही लस उपलब्ध होऊ शकते. वैज्ञानिकांद्वारे या तीनपैकी कोणत्याही लसीला मंजुरी मिळाली तर त्या लसीचे तात्काळ उत्पादन सुरु करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली. म्हणजेच ही लस सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्याचीही संपूर्ण योजना सरकारने आधीच तयार केली आहे.
यंदाच्या स्वातंत्र्य दिनावर कोरोनाचा प्रभाव दिसला. मागील वर्षी लाल किल्ल्यावरील या कार्यक्रमास सुमारे १० हजाराहून अधिक लोक उपस्थित होते आणि आजूबाजूचा संपूर्ण भाग तिरंगाने रंगला होता. परंतु यावेळी मर्यादित संख्येने लोक या कार्यक्रमात सहभागी होते. पंतप्रधान मोदी दर वर्षी भाषण संपल्यानंतर प्रोटोकॉल तोडून तिथे उपस्थित मुलांना भेटत असत. पण या वेळेस तसे झाले नाही. यावेळी कोरोना संक्रमणाच्या जोखमीमुळे मुलांना बोलावन्यात आले नाही. त्यांच्या जागी ५०० एनसीसी कॅडेट बोलावले होते. तसेच मागील वर्षाच्या तुलनेत या कार्यक्रमास येणार्या पाहुण्यांची संख्याही कमी ठेवण्यात आली होती. मागील वर्षी व्हीव्हीआयपी पाहुण्यांची संख्या २० टक्के होती. परंतु यावेळी सुमारे १५०० कोरोना वॉरियर्सना आमंत्रित करण्यात आले होते. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी लोकांना उभे राहण्याची जागाही मिळाली नाही, यावेळी लोक सामाजिक अंतराचा नियम अनुसरण उभे होते. सुरक्षा दलांनाही विशेष मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. मर्यादित संख्येने जवानांनीही सोशल डिस्टेंसिंगचे अनुसरण केले. मागील वर्षी याच ठिकाणी २० हजाराहून अधिक सैनिक तैनात करण्यात आले होते.