घरफिचर्सभौतिकशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई

भौतिकशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई

Subscribe

भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांचा आज स्मृतिदिन. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ची मुहूर्तमेढ डॉ. विक्रम साराभाई यांनी रोवली होती. म्हणूनच त्यांना ‘भारतीय अंतराळ युगाचे शिल्पकार’ असेही म्हटले जाते. भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्रात विपुल संशोधन केलेल्या डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म 12 ऑगस्ट १९१९ रोजी अंबालाल साराभाई आणि सरलादेवी साराभाई दाम्पत्याच्या पोटी झाला. गुजरातमधील अहमदाबाद हे त्यांचे मूळ गाव. साराभाई कुटुंब अगदी सधन आणि संपन्न होते. अब्दुल कलाम यांची इस्रोत निवड करणारे मराठी शास्त्रज्ञ डॉ. चिटणीस चांद्रयान-2 मोहिमेद्वारे भारताने असा रचला इतिहास डॉ. विक्रम साराभाई यांच्यासह एकूण आठ भावंडे. त्यामुळे त्यांची आई सरलादेवी यांनी मुलांच्या शिक्षणासाठी माँटेसरी पद्धतीची शाळा सुरू केली. डॉ. विक्रम साराभाईंचे सुरुवातीचे शिक्षण इथेच झाले.

गणित, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र यांमध्ये विशेष आवड असणार्‍या डॉ. विक्रम साराभाईंनी पुढील शिक्षणासाठी ब्रिटन गाठले. 1937 साली ते ब्रिटनला गेले. प्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठात. मात्र, त्याचवेळी दुसरे महायुद्ध ऐन भरात होते. त्यामुळे तिथून ते पुन्हा मायदेशी परतले. भारतात आल्यानंतर डॉ. विक्रम साराभाई यांनी बंगळुरूतील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्समध्ये संशोधनास सुरुवात केली. इथे त्यांना जे मार्गदर्शक लाभले, त्यातून डॉ. विक्रम साराभाई यांची आगामी वाटचाल कशी असेल, हे निश्चित झाले. कारण मार्गदर्शक होते नोबेल पुरस्कार विजेते सी. व्ही. रामन. 1947 साली दुसरे महायुद्ध संपले आणि ते पुन्हा ब्रिटनमध्ये गेले. तिथे त्यांनी कॉस्मिक रे इनव्हेस्टिगेशन इन ट्रॉपिकल लॅटिट्युड्स या विषयात संशोधन करून डॉक्टरेट मिळवली. ते वर्ष होते 1947. ब्रिटनमधून परतल्यानंतर डॉ. विक्रम साराभाई यांनी 11 नोव्हेंबर 1947 रोजी फिझिकल रिसर्च लॅबची स्थापना केली.

- Advertisement -

केरळमधील थुंबा येथे लाँचपॅड निश्चित करण्यात आले होते. तिथेही अनेक लहान-मोठ्या अडथळ्यांना डॉ. साराभाईंना सामोरे जावे लागले. मात्र, या सगळ्यावर मात करत रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. याचा परिणाम असा झाला की, संयुक्त राष्ट्राने पुढे या केंद्राला आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून मान्यता दिली. पुढे भारताने या केंद्राला डॉ. विक्रम साराभाई यांचेच नाव दिले. आज हे केंद्र ‘डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर’ म्हणून ओळखले जाते. ATIRAची स्थापना करून भारतातील वस्त्रोद्योगाचा पाया डॉ. साराभाईंनी रचला ECIL, UCIL यांसारख्या संस्थांसह IIM-अहमदाबादची स्थापनासुद्धा डॉ. विक्रम साराभाई यांनीच केली. अवकाश संशोधनासाठी भारत सरकारने 1962 साली समिती नेमली. अर्थात, या समितीचं नेतृत्त्व डॉ. विक्रम साराभाई यांनीच केले. डॉ. साराभाई यांच्या ज्ञानाचा आणि दूरदृष्टीचा इथेही फायदा झाला. 1969 साली याच समितीच्या शिफारशीतून ‘भारतीय अवकाश संशोधन संस्था’ अर्थात ‘इस्रो’ची स्थापना करण्यात आली. इस्रोने पुढे अवकाश संशोधन क्षेत्रात भारताचं नाव अमेरिका, रशिया यांसारख्या प्रगत देशांच्या यादीत नेऊन ठेवले. अशा या महान शास्त्रज्ञाचे 30 डिसेंबर 1971 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -