घरलाईफस्टाईलस्वयंपाकघरातील काही पदार्थही ठरु शकतात आरोग्यास घातक

स्वयंपाकघरातील काही पदार्थही ठरु शकतात आरोग्यास घातक

Subscribe

भारतीय मसाल्यांमध्ये अनेक औषधी आणि आरोग्यवर्धक गुणधर्म असतात. त्यामुळे अशाप्रकारचे मसाले केवळ आहाराचा स्वादच वाढवत नाहीत तर आरोग्याला देखील अनेक फायदे देतात. मात्र आरोग्यवर्धक आहेत म्हणून निष्काळजीपणे त्यांचा आहारात समावेश करणं किंवा वापर करणे नुकसानकारक आहे. म्हणूनच हे पदार्थ वापरताना थोडी काळजी घ्यावी.

 

बदाम

बदामाचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत असेलच; पण महिनोन्महिने स्वयंपाकघरात पडलेले बदाम किंवा कडवट झालेले बदाम आरोग्याला धोकादायक आहेत. बदामांमध्ये हायड्रोजन सायनाइडचं प्रमाण वाढल्यास ते कडवट होतात. अशा बदामांचा आहारात समावेश करणं आरोग्याला धोकादायक ठरु शकते.

- Advertisement -

बटाटा

झटपट बनणारी आणि अनेकांच्या आवडीची भाजी, मात्र खूप दिवस बटाटे घरात पडून राहिले असतील तर, हळूहळू त्याला कोंब येतात. मात्र अंकुरित बटाट्याचा आहारात समावेश करणं धोकादायक आहे.

फळांच्या बिया

सफरचंद, चेरी, नाश्पती, पीच या फळांच्या बियांमध्ये हायड्रोजन सायनाईडचं प्रमाण अधिक असतं.
याला प्रोसियिक अ‍ॅसिडही म्हणतात. या फळांच्या बिया कटाक्षाने टाळाव्यात. त्याचा आरोग्याला त्रास होऊ शकतो.

- Advertisement -

जायफळ

जायफळाची पावडर गोडाच्या पदार्थांची चव वाढवण्यापासून जुलाब थांबवण्यासाठी, झोप येण्यासाठी देखील वापरले जाते. आयुर्वेदामध्येही त्यांचं महत्त्व अधिक आहे. जायफळ अधिक प्रमाणात आहारात घेतल्यास हार्ट अटॅक, नसा कमजोर होणं, मन अस्वस्थ होणं, हायपोथेमिया अशा अनेक समस्यांचा त्रास बळावतो.

मध

शुद्ध मध मिळावं म्हणून तुम्ही थेट मधुमक्षिका पालन करणार्‍या केंद्रातून मध विकत घेत असल्यास थोडी काळजी घ्या. कारण अशा प्रकारे मध वापरणं काही लोकांसाठी त्रासदायक ठरु शकतं. अशा मधातील लहान लहान जीव आरोग्यास त्रासदायक ठरु शकतात. तसेच अशा मधाचा वापर केल्यास उलटी, चक्कर येणं असे त्रास होऊ शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -