*रिकामे पोट असताना दही खाणे सुद्धा अपायकारक ठरते. कारण रिकाम्या पोटी दह्याचे सेवन केल्यास प्रचंड अॅसिडिटी होते.
*पोटात काहीही नसताना जर आपण टोमॅटोचे सेवन केले तर पोटात गॅस्ट्रिक अल्सर होण्याची दाट शक्यता असते.
*रिकाम्या पोटी भाज्या, सॅलड खाऊ नये, या आधी काहीतरी न्याहारी करून खावे. नाहीतर पोटदुखी किंवा हृदय रोग असे आजार होऊ शकतात.
*सतत तिखट चमचमीत पदार्थ, तळलेले पदार्थ हे शरीरातील अॅसिडिटी वाढवतात. त्यामुळे अल्सर, मूळव्याधी सारख्या आजारांना आमंत्रणच मिळते.
*रिकाम्या पोटात कॉफी किंवा चहामुळे अॅसिडचे प्रमाण वाढते आणि डोकेदुखी, छातीत जळजळ, उलटी होणे या समस्या उद्भवतात.
*कार्बोनेटेड थंड पेये पिणे शरीराला घातक ठरते. अशा पेयांचे सेवन केले केल्याने रक्तपुरवठा कमी होऊन पचनशक्ती मंदावते.
*रिकाम्या पोटी खाल्लेली केळी आपल्या शरीरातील मॅग्नेशिअम आणि पोटॅशियमचा समतोल बिघडवतात.