घरलाईफस्टाईलकिचन टिप्स

किचन टिप्स

Subscribe

*डाळिंबीची उसळ शिजत असतानाच जर त्यात थोडेसे दूध घातले तर डाळिंबी अख्ख्या राहतात व त्यांचे शिजून मेन होत नाही. तसेच डाळिंबी शिजण्यापूर्वीच जर त्यात गूळ किंवा साखर घातली तर त्या दाठरतात व चांगल्या लागत नाहीत.

*सॅलेड करायच्या आधी भाज्या बर्फाच्या पाण्यात टाकाव्यात, त्यामुळे त्या टवटवीत दिसतात.

- Advertisement -

*साबुदाण्याची खिचडी करताना त्याच्यावर दुधाचा किंवा ताकाचा शिपका द्यावा. आवडत असल्यास काकडी बारीक चिरून घालावी. खिचडी मोकळी, नरम, चवदार होते.

*वरण शिजवताना तुरीच्या डाळीत चिमूटभर हिंग, हळद, व चमचाभर साजूक तूप घालावे. यामुळे डाळ नरम शिजते व स्वादही छान येतो.

- Advertisement -

*वालाची (बिरडं/डाळिंब्या/पावटे) उसळ/भाजी करताना डाळिंब्या पूर्ण व नीट शिजल्यावरच उसळीत मीठ आणि गूळ (हवा असल्यास) टाकावा अन्यथा त्या दाठरतात. (नीट शिजत नाहीत, तर दाणे टचटचीत रहातात)

*पालेभाज्या, कोथिंबीर नीट निवडून वर्तमानपत्रात गुंडाळून मग प्लास्टिकच्या डब्यात किंवा कॅरी बॅगेत घालून फ्रिजमधे ठेवाव्यात. प्रत्येक वेळी बाहेर काढल्यानंतर डबा पुसून कोरडा करावा. यामुळे भाज्या बरेच दिवस ताज्या राहतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -