अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.
- डाळ किंवा तांदळाला किड लागण्यापासून जपण्याकरीता त्यात कडूलिंबाचा पाला घालावा किंवा डाळ, तांदूळास बोरिक पावडर चोळून लावून मग भरावे.
- दुधाला विरजण लावताना दुधात थोडीशी तुरटी फिरवावी. दही घट्ट होते.
- भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतले लोह (iron) टिकण्यास मदत होते.
- भेंडीची भाजी शिजवताना त्यात चिंचेचे बुटुक किंवा दोन चमचे दही घातले तर भेंडीची भाजी चिकट होत नाही.
- पुऱ्यांसाठी कणीक भिजवतांना जर कणकेत चिमूटभर साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात.
- रात्री छोले भिजत घालताना जर त्यात मूठभर हरभरा डाळही घातली तर त्यामुळे छोले छान रस्सादार आणि दाटही होतात.
- किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा, डाग जातात.
- कढीलिंब एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिला की सुकतो. अशा कढीलिंबाची पाने तेलात तळून, डब्यात भरुन ठेवावीत. त्याचा हिरवा रंग कायम राहतो आणि ती बराच दिवस टिकतात.
- गाजर, टोमॅटो, काकडी, बीट, मुळा अशा भाज्या जून, मऊ किंवा सुरकुतलेल्या झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात. ताज्या आणि टवटवीत होतात.
- कच्ची केळी दीर्घ काळ ताजी राहण्याकरीता थंड पाण्यानी भरलेल्या पातेल्यात ठेवावी. साधारण १ आठवड्या पर्यन्त केळी टवटवित राहतात. हे पाणी दररोज बदलावे.