अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.
- पालेभाज्या शिळ्या सुकलेल्या असल्यास पाण्यात १ चमचा विनेगार किंवा लिंबाचा रस घालून ठेवल्या तर ताज्या होतात.
- शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात दोनचिमटी मीठ टाकावे आणि गॅस बंद करून थोडे परतावे. त्यामुळे साले लवकर सुटतात.
- भजी,पकोडे चुरचुरीत हवे असतील तर बेसन पीठ भिजावताना त्यात थोडेसे मक्याचे पीठ घालावे.
- शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत. दाणे खमंग भाजून होतात.
- भरीतासाठी वांगी चांगली भाजली जावी म्हणून त्याला पुसटसा गोड़ेतेलाचा हात किंवा सुरीने छोटी चिर पाडली तर भाजताना तयार होणारी वाफ पडेल. भाजल्यानंतर वांगी लगेच पातेल्याखाली झाकून ठेवल्यास साल नीट सुटतात.
- खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळ अजिबात घालू नये. त्याने दूध फाटते.
- पुदीना वाळवून त्याची पूड करून ठेवल्यास दही वड्यात ,पाणी-पुरीचे पाणी करतेवेळी उपयोगी पडतो.
- एरंडेल तेलात हळद घालून गरम करावे. गार झाल्यावर तूर हरभरा डाळीना चोळल्यास डाळी पिवळ्या दिसतात. नंतर उन्ह द्यावे.
- पावसाळयात मिठाला पाणी सुटते. बरणीवर टिपकागद ठेवून झाकण घट्ट लावावे.
- साखरेचा पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे.