- रस्सा घट्ट, स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचा कूट आणि नारळाचा चव मिक्सरमधून काढून रश्यात घालावा.
- कुठलीही भाझी कमी पाण्यात शिजवावी, त्यामुळे भाजी चविष्ट होते.
- भांड्याला कांद्याचा वास येत असेल तर ते भांडे थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवावे.
- पुसाव करताना संत्र्याच्या सालीचे चूर्ण मिसळावे, यामुळे पुलावला सुगंध येतो.
- हाताचा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळावा.
- पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडे दूध आणि बेसन मिसळावे, पुऱ्या खुसखुशीत होतील.
- मसालेदार पदार्थांची ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करावा.
- कापलेल्या सफरचंदाच्या फोडींमध्ये लिंबूरसाचे काही थेंब टाकल्यास त्या काळ्या पडत नाहीत.
- मिरचीचे देठ काढून फ्रीजमध्ये ठेवल्याने मिरच्या बरेच दिवस टिकतात.
- नूडल्स उकल्यानंतर त्यामध्ये थंड पाणी टाकल्यास नूडल्स एकमेकांना चिकटत नाहीत.