अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.
- ढोकळा छान नरम व्हावा यासाठी त्यामध्ये साखरेऐवजी साखरेचे पाणी घालावे.
- चपाती किंवा पराठ्याच्या कणकेमध्ये जरासे दूध मिसळल्यास ते छान मऊ आणि चविष्ट होतात.
- केशर मायक्रोवेव किंवा तव्यावर गरम करुन घातल्यास स्वाद अधिक छान येतो.
- कच्ची केळी पाण्यात ठेवल्यास आठवडाभर छान टवटवीत राहतात.
- भजीच्या पीठात थोडा लिंबाचा रस घातल्याने भजी कमी तेल शोषते.
- पुरी करण्यापूर्वी तेलात चिमूटभर मीठ घातल्यास पुऱ्या तेल कमी शोषतात.
- आमरसाचा आंबटपणा कमी करण्यासाठी त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात मिक्स करुन घालावा.
- साखरेचा पाक केल्यानंतर त्यात पुन्हा साखरेचे कण होऊ नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे.
- पुलात संत्र्याच्या सालीचे चूर्ण मिसळल्यास पुलावला छान स्वाद येतो.
- इडली पात्रातील इडल्यावर थोडे गार पाणी शिंपडल्यास इडल्या व्यवस्थित आणि पटापट निघतात.