अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.
- डाळ शिजवताना त्यात हळदीची पावडर आणि शेंगदाण्याच्या तेलाचे काही थेंब टाका. यामुळे डाळ पटकन शिजते आणि स्वाद पण वेगळा येतो.
- बदाम जर १५ – २० मिनिट गरम पाण्यात भिजवले तर त्याची साल पटकन निघते.
- लसूणच्या पाकळ्या थोड्या गरम केल्या कि त्याची साल पटकन निघण्यास मदत होते.
- इडली मऊ होण्यासाठी इडलीचे मिश्रण तयार करताना त्यात थोडेसे उकळलेले तांदूळ मिक्स करावे. यामुळे इडली मऊ होते.
- जास्त लिंबाच्या रसासाठी ५ ते १० मिनिटे लिंबू कोमट पाण्यात भिजवावे.
- सुख खोबर खराब होऊ नये, याकरता तुरडाळीत ठेवावे यामुळे सुक खोबर खराब होत नाही.
- चिमटीभर हळद बटाट्यांमध्ये घातल्यास ते लवकर उकडतात.
- तांदूळ पाण्यात भिजवून ठेवला तर तांदळाचा दाणा मोकळा आणि मोठा होतो.
- तुरीच्या डाळीत हिंग ठेवल्यास हिंगाचा वास टिकून राहतो.
- डाळ किंवा तांदळामध्ये कडूनिंब घातल्यास त्याला किड लागत नाही.