सातारा जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील पुणे विभागातील एक जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याला मोठी ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी लाभली आहे. सातारा जिल्ह्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात व सामाजिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. आधुनिक भारतातसुद्धा सातारा जिल्ह्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. ह्या जिल्ह्याच्या बहुतांश गावांमध्ये युवक भारतीय सेने मध्ये भरती होण्याची परंपरा जपतात. त्यामुळे शूरवीरांचा जिल्हा अशी ओळख ह्या जिल्ह्याने निर्माण केली आहे. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४८० चौ. किमी तर लोकसंख्या ३०,०३,९२२ (२०११) आहे. राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे ३.४% क्षेत्र व लोकसंख्येच्या सुमारे २.८९% लोकसंख्या सातारा जिल्ह्यात आहे. विस्तार अनुक्रमे १७०५‘ उत्तर, ते १८०११´ उत्तर अक्षांश व ७३०३३´ पूर्व ते ७४० ५४´ पूर्व रेखांश आहे. जिल्ह्यात सातारा, वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, माण (तालुका मुख्यालय दहिवडी), खटाव (वडूज), कराड, पाटण, जावळी (जावली), मेढा, महाबळेश्वर असे एकूण ११ तालुके आहेत.
मतदारसंघ क्रमांक – २६२
मतदारसंघ आरक्षण – खुला
मतदारांची संख्या
पुरुष – १५,८१,४३
महिला – १५,४३,३०
एकूण मतदार – ३१,२४,७४
विद्यमान आमदार – शिवेंद्रसिंह भोसले , राष्ट्रवादी
पहिले पाच उमेदवार
१. शिवेंद्रसिंह भोसले , राष्ट्रवादी – ९७९६४
२. दिपक पवार, बीजेपी- ५०१५१
३. हरिभाऊ सकपाळ- शिवसेना- २५४२१
४. रजनी पवार, काँग्रेस – ७१८७