श्रीरामपूर हे राहता तालुक्याच्या विभाजना अगोदर सर्वात जास्त साखर कारखाने असलेले भारतातील शहर होते. ऊस व कांदा हे येथील प्रमुख पिके आहेत. श्रीरामपूर तालुक्यात सध्या ५२ गावांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यास श्रीरामपूर हे जिल्ह्याचे मुख्यालय असेल. श्रीरामपूरला जिल्हा होण्यास लागणाऱ्या सर्व प्रशासकीय इमारती उपलब्ध असून श्रीरामपूरला स्वतंत्र आर टी ओ व उप्पर जिल्हा पोलीस कार्यालय आहेत. जिल्ह्याच्या दृष्टीने हवी असणारी उत्तम वाहतूक व्यवस्था व रेल्वे ची उपलब्धता आहे. नवीन कार्यालयांसाठी असणारी विपुल प्रमाणात सरकारी जागा आहे.
मतदारसंघ क्रमांक – २२०
मतदारसंघ आरक्षण – राखीव
मतदारांची संख्या
पुरुष – १,३७,९५५
महिला – १,२६,९८५
एकूण मतदार – २,६४,९६५
विद्यमान आमदार – भाऊसाहेब कांबळे,काँग्रेस
भाऊसाहेब कांबळे २००९-१४ विधानसभेचे सदस्य होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर फेलोशीप व संत रोहिदास भूषण या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलं आहे.
पहिले पाच उमेदवार
१) भाऊसाहेब कांबळे,काँग्रेस – ५७,११,८
२) राजाराम वाकचौरे ,भाजपा – ४५,६३,४
३) नाथा कानाडे, शिवसेना – ३७५८०
४) सुनीता गायकवाड,राष्ट्रवादी – ३५०९५
५) स्वप्निल जाधव, बसपा – १४५०
हे वाचा – अहमदनगर विधानसभा मतदारसंघ