लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि पुढील पाच वर्षासाठी आपल्या मतदारसंघातून कोणता प्रतिनिधी संसदेत खासदार म्हणून जाणार हे निश्चित झाले. याही वेळी देशात मोदी लाट उसळल्याची पाहायला मिळाली. महाराष्ट्रात देखील ४८ पैकी ४१ हे युतीचे तर ५ आघाडीचे उमेदवार खासदार म्हणून निवडून आले आहेत. तर एक वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार खासदार झाले आहेत. दिल्लीतील संसदेत आपल्या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करायला जाणाऱ्या या खासदारांपैकी बहुतांश नवे चेहरे आहेत. यंदा महाराष्ट्रातून तब्बत १९ नवे चेहरे संसदेत जाणार आहेत. या नव्या चेहऱ्यांना पहिल्यांदा खासदारही मिळाली असून त्यांचे वेगळेपण यातून पाहायला मिळत आहे. राजकारणात काही अनुभवी तर काही नवखे चेहरे यंदा खासदार बनले आहेत.
हे नवे चेहरे दिसणार संसदेत
- जळगाव – उन्मेष पाटील (भाजप)
- अमरावती – नवनीत कौर राणा (राष्ट्रवादी)
- भंडारा-गोंदिया – सुनील मेंढे (भाजप)
- चंद्रपूर – बाळू धानोरकर (काँग्रेस)
- हिंगोली – हेमंत पाटील (शिवसेना)
- नांदेड – प्रताप पाटील चिखलीकर (भाजप)
- औरंगाबाद – इम्तियाज जलिल (एमआयएम)
- दिंडोरी – डॉ. भारती पवार (भाजप)
- मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) – मनोज कोटक (भाजप)
- रायगड – सुनील तटकरे (राष्ट्रवादी)
- पुणे – गिरीष बापट (भाजप)
- शिरूर – अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
- अहमदनगर – सुजय विखे पाटील (भाजप)
- उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर (शिवसेना)
- लातूर – सुधाकरराव श्रृंगारे (भाजप)
- सोलापूर – जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप)
- माढा – रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)
- कोल्हापूर – संजय मंडलिक (शिवसेना)
- हातकणंगले – धैर्यशील माने (शिवसेना)