रायगडमधील महड येथे महाप्रसादातून ५० ते ६० जणांना विषबाधा झाली असून ३ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. बाधित रूग्णांवर पनवेलमधील रूग्णालयात उपचार सुरू असून २५ जणांची प्रकृती गंभीर आहे.
कशी झाली विषबाधा?
- Advertisement -
सोमवारी खालापूरमधील महड येथे माळी कुटुंबाच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम होता. यावेळी सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री उशिरा ५० ते ६० लोकांना उलटी आणि मळमळण्याचा त्रास झाला. त्यानंतर सर्वांना खोपोलीच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात जाईपर्यंत ३ लहान मुलांचा मृत्यू झाला होता. सध्या २५ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना पनवेलमधील रूग्णालयात हालवण्यात आले आहे.