घरमहाराष्ट्रमुंबईत ३५०० रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत

मुंबईत ३५०० रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत

Subscribe

वर्षभरात ५३ अवयवदान पार पडले

मरणानंतरही अवयवरुपी जीवंत राहण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे अवयवदान…आपल्या मरणानंतर कोणाला तरी आयुष्य नव्याने जगता यावे, यासाठी अवयवदान करणे फार महत्त्वाचे आहे. १३ ऑगस्ट हा अवयवदान दिन म्हणून पाळला जातो. मानवी शरीरातील हृदय, फुफ्फुस, यकृत, किडनी, त्वचा, डोळे आणि हात हे अवयव दान केले जाऊ शकतात. पण, अवयव दानाबाबतच्या असलेल्या बर्‍याच गैरसमजुतीमुळे अवयवदानासाठी लोक पुढाकार घेत नाही. त्यातही सर्वात मोठी प्रतिक्षा यादी ही किडनीसाठी आहे. वर्षभरात ५३ अवयव दान पार पडले तरीही मुंबईत जवळपास ३ हजार ५०० जण किडनीच्या प्रतिक्षेत आहेत.

सध्या किडनी या अवयवाच्या प्रतिक्षा यादीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याची कारणे वेगवेगळी आहेत. किडनीला होणारे आजार हे अनेकदा खूप उशिरा लक्षात येत असल्यामुळे याला सायलेंट किलर या आजाराने ही ओळखले जाते. सध्या मुंबईत जवळपास ३५०० जणांना किडनीची आवश्यकता आहे.

- Advertisement -

विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षात एकूण ५३ अवयवदान पार पडली आहेत. त्यात सर्वात जास्त दान ही किडनीचेच करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ ४२५ जण यकृताच्या प्रतीक्षेत आहेत. तर, २५ जण हृदय, १२ जण फुप्फुस, ५ जणांना स्वादुपिंड आणि तिघांना हातांची गरज आहे.

अवयवदानाची मागणी आणि अवयव उपलब्ध होणार्‍या संख्येत मोठी तफावत आहे. वर्षाकाठी फक्त हजार ते १००० बाराशे अवयव दान केले जातात. पण, अवयवाच्या मागणीची संख्या लाखोंच्या घरात असते. एखाद्या ब्रेनडेड व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबियांच्या परवानगीनुसार किडनी, लिवर, हृदयाच्या झडपा, ह्रदय, हात, फुप्फुस आणि डोळे हे अवयव दान करता येतात. त्यातून, दुसर्‍याचा जीव वाचू शकतो.

- Advertisement -

दरवर्षी ५ लाख रुग्ण अवयव न मिळाल्याने मृत पावतात. यातील २ लाख रुग्णांना यकृत, ५० हजारांना हृदयाची गरज, दरवर्षी दीड लाख जणांना किडनीची गरज असते. पण, फक्त ५ हजार रुग्णांनाच किडनी मिळते. देशात १० लाख अंधरुग्ण नेत्रदानाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे, अवयवदानाची चळवळ लोकांच्या मनामनात रुजली पाहिजे. दात्यांची संख्या वाढणे गरजेचे आहे.

तसेच वर्षानुवर्षे एका अवयवासाठी प्रतीक्षा यादीत असणार्‍या रुग्णांच्या आयुष्यात नवीन पहाट उगवण्यास मदत होईल. विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, १९९७ सालापासून ते ८ ऑगस्ट २०१९ पर्यंत १ हजार २६४ यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. त्यात हृदय १२३ , किडनी ७८७, यकृत ३३८ आणि फुप्फुस १६ हे अवयव दान करण्यात आले आहेत.

‘रोटो-सोटो’ च्या (पश्चिम विभागीय) संचालक डॉ. लोबो गाजिवाला यांनी सांगितले की, ‘‘ यंदाच्या वर्षी अवघ्या पाच महिन्यांत ३१० अवयव प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. पण, गरजूंच्या तुलनेत दात्यांची संख्या अजूनही कमी पडते आहे. यासाठी दात्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.’’

किडनीविकार टाळण्यासाठी काय कराल?
किडनीविकार हा बर्‍याचदा त्याच्या अंतिम स्तरात पोहचल्यावरच त्याची लक्षणे दिसून येतात. म्हणूनच योग्य वेळी लक्षण जाणा आणि धोका टाळा, दर १५ मिनिटांनी एक वाटी पाणी प्यावे, १-१ तासांनी लघवी करावी, सतत पेनकिल्रर्स घेतल्याने किडनीविकार उद्भवतात, प्रोटिन्सचे अधिक सेवन टाळा, इन्फेक्शनमुळे काही आजार झाले असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, रक्तातील वाढलेले साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी गोड खाण्यावर मर्यादा घाला. योग्य दिनचर्या, व्यायाम व आहार यामुळे किडनीसह सर्वच विकारांना प्रतिबंध घालता येतो.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -