घरमहाराष्ट्रराज्यात ३,९५९ नवे रुग्ण, १५० जणांचा मृत्यू

राज्यात ३,९५९ नवे रुग्ण, १५० जणांचा मृत्यू

Subscribe

राज्यात १५० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, ४५,११५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

राज्यात ३,९५९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १७,१४,२७३ झाली आहे. राज्यात ९९,१५१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात १५० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, ४५,११५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.

राज्यात १५० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई २३, ठाणे ५, उल्हासनगर मनपा ५, नाशिक ७, पुणे ३६, सोलापूर ६, सातारा ३२, सांगली ६ आणि नागपूर ३ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या १५० मृत्यूंपैकी ७० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३३ मृत्यू सातारा १५, पुणे ७, नाशिक ३, ठाणे ३, सांगली २, चंद्रपूर १, सोलापूर १ आणि रत्नागिरी १ असे आहेत.

- Advertisement -

आज ६,७४८ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १५,६९,०९० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.५३ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९३,७८,५३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,१४,२७३ (१८.२८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,७१,१६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९,७९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -