घरमहाराष्ट्रसरकारने शिर्डी संस्थानकडून घेतलं ५०० कोटींच कर्ज

सरकारने शिर्डी संस्थानकडून घेतलं ५०० कोटींच कर्ज

Subscribe

शिर्डी संस्थाने दिले राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला ५०० रुपये कोटींच कर्ज

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने शिर्डीतील साई संस्थानकडून व्याजमुक्त ५०० कोटींचं कर्ज घेतलं आहे. हा निधी राज्य सरकार अपूर्ण असलेल्या निळवंडे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वापरणार आहे. निळवंडे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने शिर्डी साई संस्थेकडे कर्जाची मागणी केली होती. या मागणीला शिर्डी साई संस्थानचे प्रमुख सुरेश हावरे यांनी निर्णय घेत सरकारला हे कर्ज मंजूर केलं आहे. राज्य सरकारने आतापर्यंत इतकं मोठं कर्ज कुठल्याही संस्थेकडून घेतलं नाही. ही पहिलीच वेळ असून हे कर्ज फेडण्यासाठी सरकारला कुठलीही कालमर्यादा घालण्यात आलेली नाही हे विशेष आहे. हे पैसे निळवंडे सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वापरणार असल्याने आता हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर नगर जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

कर्जाच्या मुद्द्यावर बैठक

गेल्या १ फेब्रुवारीला मुख्यंमत्र्यांच्या अक्ष्यक्षतेखाली कर्जाच्या मुद्द्यावर बैठक झाली होती. या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला साई संस्थानने शनिवारी मंजुरी दिली. तसेच हे कर्ज सरकारला दोन टप्प्यात देण्यात येणार आहे. शिर्डी साई संस्थान आणि गोदावरी – मराठवाडा सिंचन विकास महामंडळात याबाबत करार करण्यात आला आहे. साई संस्थानच्या इतिहासात हे प्रथमच घडलं असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

- Advertisement -

वाचा – शिर्डीचे साईबाबा बनले चक्क ‘मतदार’!


नगर जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न सुटणार

निळवंडे सिंचन प्रकल्प काही कालावधीपासून रखडलं आहे. या प्रकल्पाचा १२०० कोटी इतका खर्च आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी शिर्डीच्या संस्थेने तब्बल ५ कोटी रुपयांचे कर्ज दिले असल्याने आता हे काम लवकरच पूर्ण होऊन नगर जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तर जलसंपदी विभागाला यासाठी अर्थसंकल्पातून ३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पासाठी आगामी अर्थसंकल्पात ४०० कोटींची तरतूद करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. येत्या दोन वर्षात सिंचन प्रकल्पाचा डावा आणि उजवा कलवा बांधून पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

- Advertisement -

शिर्डीत मोठ्या संख्येने साई भक्त येत असतात. शिर्डीत दररोज ७० हजार भाविक साई बाबांच्या दर्शनाला येतात. मात्र उत्सवाच्या काळात ही संख्या साडेतीन लाखाच्यावर जाते. पण त्याभागात पाण्याची मोठी टंचाई असल्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न असून अकोला, संगमनेर, राहुरी, कोपरगाव आणि शिर्डी या तालुक्यांना आणि इतर गावांना प्रकल्पाचा फायदा होणार असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.


वाचा – शिर्डीत येऊनही पंतप्रधान खोटे बोलल्याचे दुःख – खा. अशोक चव्हाण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -