चंद्रपूरात वाघ हल्ल्यात एका ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शनिवार, १० नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. सखुबाई कस्तुरे असे या मृत महिलेचे नाव आहे. मृतदेहाच्या बाजूला वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. चंद्रपूरातील पेंढरू गावात या महिलेवर वाघाने हल्ला केला असून त्यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
#Maharashtra: Woman killed in a tiger attack in the forest area near Chandrapur’s Pendru village. pic.twitter.com/sc1BVMbn1j
— ANI (@ANI) November 10, 2018