कोरोना विषाणूने देशात अक्षरश: कहर केला असून याचा सर्वात अधिक फटका हा महाराष्ट्राला बसला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला कोरोना रुग्णांना ताप, सर्दी, खोकला आणि दम लागणे ही लक्षणे दिसून येत होती. मात्र, आता राज्यात कोरोनाचे ८० टक्के रुग्णांना लक्षणे दिसून येत नसल्याची माहिती मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी दिली आहे. तसेच कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण १४ दिवसांवर आले आहे.
As of now, there are 35,178 active cases in Maharashtra. 80% of cases are asymptomatic in the state. Doubling rate in Maharashtra is right now 14 days, earlier it was 5 days: Ajoy Mehta, Chief Secretary #COVID19 pic.twitter.com/bRUEpg7sAs
— ANI (@ANI) May 26, 2020
दुप्पट होण्याचे प्रमाण ५ वरुन १४ दिवसांवर
राज्यात कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण पाचवरुन १४ दिवसांवर आले आहे, अशी माहिती देखील अजॉय मेहता यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ३५ हजार १७८ अॅक्टिव्ह केसेस आहेत, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
हेही वाचा – संगमनेरमध्ये बाधित महिलेचा मृत्यू