घरमहाराष्ट्रऔरंगाबाद येथील अपघातात दोघांचा मृत्यू

औरंगाबाद येथील अपघातात दोघांचा मृत्यू

Subscribe

औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू

औरंगाबाद येथे कार आणि कंटेनरला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. औरंगाबाद येथील दौलताबाद टी पॉंईट ते माळीवाडा दरम्यान पहाटेच्या सुमारास कार आणि कंटेनरमध्ये धडक होऊन हा अपघात झाला आहे. या घटनेमध्ये पराग कुलकर्णी आणि अरुण काकडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे दोघेही बजाज फायन्स कंपनीत कामाला असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला असून क्रेनच्या सहाय्याने रस्त्यात असलेल्या कारला बाजूला काढण्यात आले आहे.

असा घडला अपघात

पराग कुलकर्णी हा मूळचा नाशिकचा रहिवासी आहे. गेली काही वर्षांपासून तो कामानिमित्त औरंगाबाद येथील तारांगण कासलीवाल इथल्या जी – ५ सेक्टरमध्ये राहत होता. पराग हा कामानिमित्त मित्रासोबत बाहेर गेला होता. काम संपवून तो घरी परत येत होता. त्याची कार दौलताबाद टी पॉंईट ते माळीवाडा दरम्यान पोहोचली असता कार आणि कंटेनर यांच्यात धकड झाली त्यात दोघांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोघांना घाटी रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्या दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

- Advertisement -

वाचा – पुणे-नगर महामार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -