घरमहाराष्ट्रदुकान बंद होऊ नये म्हणून फडणवीस टीका करतात

दुकान बंद होऊ नये म्हणून फडणवीस टीका करतात

Subscribe

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या मुद्यांवरुन राज्य सरकारवर टीका करत असतात. देवेंद्र फडणवीस हे चांगले काम केले तरी टीकाच करणार आहेत. त्यांचे दुकान बंद होऊ नये म्हणून ते टीका करत असतात, असा टोला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लगावला आहे. अनिल देशमुख यांनी नववर्षाच्या निमित्ताने पुण्यातील येरवडा कारागृहाला भेट दिली. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

येरवडा कारागृहबाबत काही मागण्या होत्या. त्याबाबतचे निवेदन यावेळी अनिल देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आले. कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त संख्या असून आपल्याला मॉडर्न कारागृह करायचे आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे कारागृहाची क्षमता वाढवण्यासाठी प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती यावेळी अनिल देशमुख यांनी दिली.

- Advertisement -

भिडे, एकबोटे यांच्यावर रितसर कारवाई होईल आणि चार्जशीटचा प्रस्ताव देखील मंजूर केला गेला आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले. तसेच बी. जी. कोळसे पाटलांची सुरक्षा का काढली याचा आढावा घेत असल्याचे ते म्हणाले आहेत.

दरम्यान, याआधी सुबोध कुमार जैस्वाल यांच्यावरून तुम्हाला देवेंद्र फडणवीस हे लक्ष करीत आहे, असे विचारले असता ते म्हणाले होते की, देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेता आहेत. त्यामुळे जे काही आमच्या बद्दल बोलणार ते विरोधातच बोलणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एवढे काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -