भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर नाव न घेता टीका केली. शेलार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन एक कविता शेअर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जवळीक वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी कवितेमार्फत राज ठाकरेंवर टीका केली आहे. राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात वाढलेल्या जवळीकचा उल्लेख शेलार यांनी ‘शिवाजी पार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे’ असा केला आहे.
#ChokidarकेSideEffect हा हॅशटॅग देऊन टीका
शेलार यांनी ट्विटरवर हॅशटॅग सुरु करुन विरोधकांवर टीका करण्याची नवी मोहीम सुरु केली आहे. बुधवारी शेलारांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेच्या शेवटीदेखील हॅशटॅग वापरण्यात आला होता. #ChokidarकेSideEffect हे हॅशटॅग वापरुन शेलारांनी दोन्ही ट्विट केले आहेत.
नेमकी काय आहे कविता?
‘सोडून गेले नगरसेवक…सोडून गेले आमदार…एकटे एकटे वाटले म्हणून स्वतःच्या काकांच्या नाही..जाणत्या राजाला गाठले..पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्ट हातात देऊन.. बारामतीच्या काकांनी “फक्त लढ” असे म्हटले.!!’, अशी कविता आशिष शेलारांनी टाकली आहे.
सोडून गेले नगरसेवक…सोडून गेले आमदार…एकटे एकटे वाटले म्हणून स्वतःच्या काकांच्या नाही..जाणत्या राजाला गाठले..पाठीवर हात ठेऊन..नव्या भाषणाची स्क्रिप्ट हातात देऊन.. बारामतीच्या काकांनी “फक्त लढ” असे म्हटले.!!
“शिवाजीपार्कच्या बाभळीला बारामतीची बोरे”#ChokidarकेSideEffects— Chowkidar ashish shelar (@ShelarAshish) March 28, 2019