घरमहाराष्ट्रबिल मागितले म्हणून हॉटेल मालकावर हल्ला,दोघांना अटक

बिल मागितले म्हणून हॉटेल मालकावर हल्ला,दोघांना अटक

Subscribe

जेवणाचे बिल मागितले म्हणून प्रेमचंद्र नागू चव्हाण या ४२ वर्षांच्या हॉटेल मालकावर चारजणांच्या एका टोळीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना कांदिवलीतील चारकोप परिसरात घडली. हल्ल्यात प्रेमचंद्र हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी चौघांविरुद्ध गंभीर दुखापतीसह अन्य भादवीविरुद्ध चारकोप पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून याच गुन्ह्यांत पळून गेलेल्या दोघांना अटक केली तर इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. ही घटना रविवारी कांदिवलीतील चारकोप येथील साईधामनगर, चव्हाण टी अ‍ॅण्ड कोल्डींक्स स्नॅक्स कॉर्नर हॉटेलमध्ये घडली.

प्रेमचंद्र हे साईधाम नगर, फ्लॅट क्रमांक १२४ मध्ये राहत असून याच परिसरात त्यांच्या मालकीचे एक टी अ‍ॅण्ड कोल्डींक्स स्नॅक्सचे हॉटेल आहे. रविवारी या दुकानात तिथे चार तरुण आले होते. या चौघांनी जेवण केले, मात्र जेवणाचे बिल मागितले म्हणून त्यांनी प्रेमचंद्र यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद सुरु असताना त्यातील दोघांनी त्यांना लाथ्याबुक्यांनी मारहाण केली तसेच लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. हल्ल्यानंतर त्यांनी त्यांना बघून घेण्याची धमकी देऊन तेथून पलायन केले. ही माहिती मिळताच चारकोप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

- Advertisement -

याप्रकरणी प्रेमचंद्र यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर दोघांना पोलिसांनी अटक केली तर इतर दोघांचा आता पोलीस शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -