घरमहाराष्ट्रभाजीच्या गरम पातेल्यात पडून चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

भाजीच्या गरम पातेल्यात पडून चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Subscribe

हर्षल खेळता खेळता स्वयंपाक घरामध्ये आला. त्यावेळी खेळता खेळता त्याला चक्कर आली आणि तो गरम भाजीच्या पातेल्यामध्ये पडला.

औरंगाबादमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. गरम भाजीमध्ये पडून ३ वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना औरंगाबादच्या चिखलठाणा भागात घडली आहे. याठिकाणी पुष्पक गार्डन परिसरामध्ये संतोष गाधू हे आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांना तीन वर्षाचा हर्षल होता. सोमवारी रात्री त्यांच्या पत्नीने स्वयंपाक केला. स्वयंपाकात केलेल्या भाजीच्या पातेल्यात पडून हर्षलचा मृत्यू झाला.

अशी घडली घटना?

संतोष गाधू यांच्या पत्नी सोमवारी रात्री स्वयंपाक करत होत्या. त्यावेळी त्याचा मुलगा हर्षल हा घरासमोर खेळत होता. हर्षलच्या आईचा स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जेवणासाठी बनवलेल्या भाजीचे पातेलं खाली ठेवले. हर्षल खेळता खेळता स्वयंपाक घरामध्ये आला. त्यावेळी खेळता खेळता त्याला चक्कर आली आणि तो गरम भाजीच्या पातेल्यामध्ये पडला. यामध्ये हर्षलचा चेहरा आणि डोकं गंभिररित्या भाजले.

- Advertisement -

आकस्मित मृत्यूची नोंद

हर्षलच्या रडण्याचा आवाज ऐकतात घरातील सर्वजणांनी स्वयंपाक घराकडे धाव घेतली. हर्षल भाजीच्या पातेल्यात पडला होता. त्याला तातडीने त्यांनी घाटी रुग्णालयात हलवले. मात्र उपचारा दरम्यान आज त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हर्षलच्या निधनाने त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. याप्रकरणी एमआयडीसो सिडको पोलीस ठाण्यामध्ये हर्षलच्या आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -