ठाकरे सरकारचे पहिलेच अधिवेशन नागपूर येथे होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर भाजपने आज विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन करत आक्रमक पवित्रा घेतला. मी पण सावरकर असा संदेश लिहिलेल्या भगव्या टोप्या घालून भाजप आमदारांनी सरकारवर विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
राहुल गांधींनी माफी मागावी यासाठी भाजप आमदारांची नागपूर विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शन करत जोरदार घोषणाबाजी… @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @ShivsenaComms
@NCPspeaks @INCMaharashtra @OfficeofUT #MahaWinterSession #नागपूरअधिवेशन @ChDadaPatil pic.twitter.com/i9LfHhHRMg— My Mahanagar (@mymahanagar) December 16, 2019
"सावरकरांच्या मुद्द्यावर आक्रमक व्हा. सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करा" विधीमंडळ गटाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदारांना दिले. @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @ShivsenaComms @NCPspeaks @INCMaharashtra @OfficeofUT #MahaWinterSession #नागपूरअधिवेशन pic.twitter.com/edJFYZ36Wi
— My Mahanagar (@mymahanagar) December 16, 2019
सावरकर यांच्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत असताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ते रेकॉर्डवरुन काढून टाकण्यास सांगितले. त्यामुळे सभागृहात गोंधळ होऊन कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. #NagpurWinterSession #नागपूरअधिवेशनhttps://t.co/I45gCQ25fE
— My Mahanagar (@mymahanagar) December 16, 2019