घरमहाराष्ट्रलाचखोर राज्यमंत्री दिलीप कांबळेची तात्काळ हकालपट्टी करा - सचिन सावंत

लाचखोर राज्यमंत्री दिलीप कांबळेची तात्काळ हकालपट्टी करा – सचिन सावंत

Subscribe

'चौकीदार ही चोर है' ही घोषणा किती खरी आहे, हे महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाकडे पाहिल्यावर समजून येते. तसेच राज्यमंत्री दिलीप कांबळे हे लाचखोर असून त्यांची तात्काळ हकालपट्टी करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

‘चौकीदार ही चोर है’ ही घोषणा किती खरी आहे, हे महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाकडे पाहिल्यावर समजून येते. राज्यातील दिलीप कांबळे या मंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी टोळीने लाचखोरी करून लोकांकडून लुट केली जाते. हे न्यायालयाने दिलीप कांबळेंवर गुन्हा करणायाच्या दिलेल्या आदेशाने सिद्ध झाले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रीमंडळ आहे की अलीबाबा आणि चाळीस चोरांची टोळी? असा संतप्त सवाल करून मुख्यमंत्री मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर किती पांघरून घालणार. अशी विचारणा करून जरा तरी शरम वाटत असेल तर दिलीप कांबळे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

नेमके काय घडले?

राज्याचा मंत्री सरकारी निवासस्थानातून आपले हस्तक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या साथीने राजरोसपणे दारू दुकानाचा परवाना देण्याकरीता २ कोटी पंधरा लाख रूपये लाच घेतली, अशी तक्रार करण्यात आली होती. औरंगाबाद येथे राहणारे विलास चव्हाण यांनी ही तक्रार केल्याचे समोर आले आहे. मंत्र्यांच्या बंगल्यावर चार वेळा मंत्री भेटले आणि त्यांनी लाचेची मागणी केली, असेही या तक्रारीत म्हटले आहे. सदर मंत्र्यांच्या हस्तकांच्या खात्यावरही लाचेचे पैसे आले आहेत. तसेच दिलीप कांबळेंचे खासगी सचिव मनाळे यांनी ६० लाख रूपये लाचेची रक्कम कांबळे यांच्या निवासस्थानी स्वीकारली, असे आरोप करण्यात आले आहेत.

- Advertisement -

तसेच फिर्यादी चव्हाण यांच्या पत्नींच्या बँक खात्यातूनही दिलीप कांबळे यांच्या खात्यावर १० लाख रूपये लाचेची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. न्यायालयाने याची दखल घेऊन सामूहीक गुन्हेगारी अंतर्गत भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ४२०, १२० ब, ४०६ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने औरंगाबादच्या सिडको पोलीस स्थानकात मंत्री दिलीप कांबळे यांच्यासह चारही आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फक्त गुन्हा नोंद करून चालणार नाही तर पोलिसांनी तात्काळ मंत्री दिलीप कांबळे यांना अटक केली पाहिजे. अन्यथा ते फिर्यादीवर दबाव आणू शकतात. लाचखोर मंत्र्यांना सोबत घेऊन सरकार चालवत असल्याने मुख्यमंत्र्यांनी सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, असे सावंत म्हणाले आहेत.


वाचा – २०१९ ची निवडणूक देशाची दिशा ठरवणार – सचिन सावंत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -