घरमहाराष्ट्रअधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार

अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार

Subscribe

कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे संकेत

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या नव्या पर्वास सुरुवात झाली असली तरी सर्वांचे लक्ष हे ठाकरे सरकारच्या विस्तराकडे लागून राहिले आहे. नव्या ठाकरे सरकारचा शपथविधी पूर्ण झाला असताना देखील अद्याप मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त नेमकां कधी मिळणार यावरुन राजकीय तर्क वितर्कांना उधाण आले आहेत. राजकीय क्षेत्रात सुरू असलेल्या या चर्चेला कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न रविवारी पुण्यात केला. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आगामी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी होण्याचे संकेत छगन भुजबळ यांनी पुण्यात दिले आहेत.

त्यामुळे आता सर्वांचे लक्ष नागपूर येथे होणार्‍या हिवाळी अधिवेशनावर लागून राहिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह एकूण सहा मंत्र्यांनी शिवाजी पार्क येथे पार पडलेल्या सोहळ्यात मंत्री पदाची शपथ ग्रहण केली. हा शपथ ग्रहण सोहळ्याला नऊ दिवस पूर्ण झाले असले तरी अद्याप खातेवाटप आणि मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नसल्याने आता विरोधकांनी याविरोधात टीका करण्यास सुरुवात केली आहे. या तिन्ही पक्षांत एकमत नसल्याची टीका देखील यावेळी विरोधकांनी केली असून शपथग्रहण केलेल्या मंत्र्यांना बिनखात्याचे मंत्री म्हणू लागले आहेत. त्यामुळे राज्यातील लोकांना मंत्रीमंडळ विस्ताराची आणि खातेवाटपाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. यासंदर्भात रविवारी प्रसार माध्यमांनी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विचारणा केली असता त्यांनी वरील संकेत दिले.

- Advertisement -

यावेळी पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, विधीमंडळाचं अधिवेशन सुरु झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.तर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत सांगताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे लोकांचे दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यानुसार विधीमंडळाचं अधिवेश 16 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. 17 डिसेंबर किंवा त्यानंतरच ठाकरे सरकारचा विस्तार होईल, असे बोलले जाऊ लागले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपासाठी सर्व महाविकास आघाडीच्या आमदारांना आणि राज्यातील जनतेला अजून 9 ते 10 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.30 नोव्हेंबर रोजी झालेल्या बहुमत चाचणीत महाविकास आघाडीने त्यांच्याकडील बहुमत सिद्ध केलं आहे.

तिन्ही पक्षांचा कॉमन मिनिमम प्रोग्रामदेखील ठरला आहे. महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वी तिन्ही पक्षांमधील प्रमुख नेत्यांमध्ये अनेक बैठका, चर्चा झाल्या आहेत. या बैठका अजूनही सुरुच आहेत. परंतु अद्याप खातेवाटप आणि मंत्रीमंडळ विस्ताराचं घोडं कुठे अडकलं आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात मंत्रीपदांबाबत रस्सीखेच सुरु असल्यामुळे खातेवाटपला मुहूर्त मिळत नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. यावर पुढील 7-8 दिवसात तोडगा निघाला नाही तर मंत्रीमंडळ विस्तार लांबेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -