घरदेश-विदेशतिरुपतीला जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांच्या गाडीला अपघात; ५ ठार

तिरुपतीला जाणाऱ्या महाराष्ट्रातील भाविकांच्या गाडीला अपघात; ५ ठार

Subscribe

आंध्रप्रदेशमध्ये भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. आंध्रप्रदेशच्या कर्नूल- कडप्पा महामार्गावर हा भीषण अपघात झाला असून यामध्ये ५ भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर ११ भाविक गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मृत आणि जखमी महाराष्ट्रातील मुखेड तालुक्यातील आहेत.

मुखेड तालुक्यातील वसूर तांडा येथे राहणारे राठोड आणि चव्हाण कुटुंबातील १६ जण तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी निघाले होते. क्रूझर गाडी करुन बुधवारी हे सर्व जण देवदर्शासाठी निघाले होते. मात्र देव दर्शन करण्याआधीच त्यांच्या गाडीवर काळाने घाला घातला. आंध्रप्रदेशच्या कडप्पा येथे त्याची गाडी २० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात गाडीमधील ३ जण जागीच ठार झाले तर ११ जण गंभीर जखमी झाले. जखमींना तिरुपती येथील रिम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

अपघातामध्ये जखमी झालेल्यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. या घटनेची माहिती कळताच मुखेड तालुक्यातील वसूर तांडा येथे दुख:चा डोंगर कोसळला आहे. चव्हाण आणि राठोड कुटुंबियाच्या नातेवाईकांनी तिरुपती येथील रिम्स रुग्णालयात धाव घेतली आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -