घरCORONA UPDATECoronavirus: 'कोरोनासाठी मोदींकडे 'टाळी, थाळी, दिवाळी' असा त्रिसूत्री कार्यक्रम'

Coronavirus: ‘कोरोनासाठी मोदींकडे ‘टाळी, थाळी, दिवाळी’ असा त्रिसूत्री कार्यक्रम’

Subscribe

“प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा टीव्हीसमोर येऊन स्वगत व्यक्त करताना ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता सर्व भारतीयांनी घरात अंधार करून दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. मागील १५ दिवसांच्या कालावधीत प्रधानमंत्री मोदी यांचे हे तिसरे भाषण असून प्रत्येकवेळी कोरोना विषाणूच्या विरोधात काहीतरी नवीन जुमला लोकांसमोर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. एकूणच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोदींकडे टाळी, थाळी आणि दिवाळी असा त्रिसूत्री कार्यक्रम दुर्दैवाने आहे”, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

आज सकाळी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी कोरोना संसर्गाविषयीचे आकडे, आरोग्य व्यवस्थेची तयारी, लाखो स्थलांतरित मजुरांचा गंभीर प्रश्न, अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने रोजगारावर होणारे परिणाम या सर्व मुद्द्यांना स्पर्श न करता फक्त दिवे लावण्याचे आवाहन केले, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी १ ते ३१ मार्च या कालावधीत २८ तर युकेचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी आजारी पडण्याआधी १८ पत्रकार परिषदा घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना म्हणजेच पत्रकारांच्या माध्यमातून आलेल्या जनतेच्या प्रश्नांना नियमितपणे सामोरे गेले आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थीतीचा सामना करताना आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे एकमेव जागतिक नेते (राष्ट्रप्रमुख किंवा शासन-प्रमुख) आहेत की ज्यांनी आतापर्यंत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, अशी टीकाही चव्हाण यांनी केली.

चव्हाण पुढे म्हणाले की, “देश एवढ्या गंभीर परिस्थितीतून जात असतानादेखील कार्यालयात बसून अधिकाऱ्यांनी लिहून दिलेले भाषण वाचून एकतर्फी संवाद (monologue) साधण्यापेक्षा पत्रकार परिषद घेउन देशवासीयांना आश्वस्त करण्याऐवजी त्यांनी टाळी, थाळी आणि आता दिवाळी अशी त्रिसूत्री लोकांसमोर मांडली आहे हे अतिशय दुर्दैवी आहे.”

एक प्रतिक्रिया

  1. पी एम नि संपूर्ण देशात 5एप्रिल ला रात्री 9-00 ला 9 मिनिटे सर्वत्र घरातील लाइट बंद करून साधी तेलाचे दिवे मोम्बत्ती वगैरे च्या सहाय्याने घरा समोर प्रकाश करा असा संदेश दिला असता त्यावर टीका होत आहे .टीका करण्यापेक्षा काय केली पाहिजे ह्याबाबत मोदीजी ह्यांना कोणीच सांगत नाही .क्रुपया आपणच त्यांना समजावून सांगा काय केले पाहिजे ?

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -