घरताज्या घडामोडीवुहानमधील ३६ जण महाराष्ट्रात परतले; मुंबईत दोघांवर उपचार सुरू

वुहानमधील ३६ जण महाराष्ट्रात परतले; मुंबईत दोघांवर उपचार सुरू

Subscribe

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या पाच जण निरीक्षणाखाली असून २ जण मुंबईत तर ३ जण पुण्यात दाखल असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

वुहानमध्ये करोनाच्या हलकल्लोळानंतर एअर इंडियाच्या विमानाने आलेल्या ६४५ भारतीयांना दिल्लीच्या आयटीबीपी आणि मानेसर आर्मी कॅम्पमध्ये विलगीकरण कक्षात १४ दिवस ठेवण्यात आले होते. यातील ३६ जणांची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याने बुधवारी राज्यात परतले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

विलगीकरण कालावधी संपल्यानंतर आता या प्रवाशांना आपापल्या मूळगावी जाण्यास हरकत नसल्याचे सांगण्यात आले. या प्रवाशांचा पुढील १४ दिवसांसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, आजतागायत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४१ हजार २०८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. राज्यात बाधित भागातून २६६ प्रवासी आले आहेत.

- Advertisement -

राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ७१ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ७० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला. तर, भरती ७१ प्रवाशांपैकी ६९ जणांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. सध्या दोन जण मुंबईत दाखल आहेत. दरम्यान, बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण २६६ प्रवाशांपैकी १४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

पाच जण करोना निरीक्षणाखाली; २ जण मुंबई तर ३ जण पुण्यात 

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या पाच जण निरीक्षणाखाली असून २ जण मुंबईत तर ३ जण पुण्यात दाखल असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -