राज्याच्या गृहविभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ६० तुरुगांतील जवळपास ११ हजार कैदांना तातडीने पारोल देण्याचे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.
७ वर्ष किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील ६० तुरूंगांतील
जवळ-जवळ
११,००० आरोपी / गुन्हेगारांना तातडीने पारोल देण्याचे मी आदेश दिले आहेत. पुढील आठवड्याभरात यावर कारवाई व्हावी अशाही सूचना दिल्या गेल्या आहेत.— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 26, 2020
आतापर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये करोनाचा शिरकाव झाला नव्हता. यापैकीच एक सिंधुदुर्ग जिल्हा होता. मात्र आता सिंधुदुर्गात पहिला करोनाबाधित रुग्ण आढळला आहे. कर्नाटकमधील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने कणकवली येथील नागरिकाला करोनाची लागण झाली आहे.
राज्यातील सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
"सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना २४ तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे."
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 26, 2020
मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्या लागतील.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 26, 2020
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील करोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी आपले एक दिवसाचे वेतन देण्याचे आज जाहीर केले. आपला धनादेश लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीला पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राजभवनातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी देखील आपले एक दिवसाचे वेतन करोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार असल्याचे राजभवनाकडून आज जाहीर करण्यात आले.
राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात करोनाची लागण १२६ जणांना झाली आहे. या पाठोपाठ केरळमध्ये देखील करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. केरळमध्ये आतापर्यंत १०९ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सध्या देशातील करोना वाढता प्रसार पाहून संपूर्ण देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसंच आतापर्यंत देशभरातील करोनाबाधितांचा आकडा ६०६वर पोहोचला आहे.