घरमहाराष्ट्रदरियानी ट्रस्टनीं दिली लष्कराला ४० कोटींची देणगी

दरियानी ट्रस्टनीं दिली लष्कराला ४० कोटींची देणगी

Subscribe

दक्षिण मुंबईचे वयोवृद्ध समाजसेवक आणि राधा कलिंदस दरियानी ट्रस्टचे प्रमुख प्रेम दर्यानी यांनी पुन्हा एकदा मालकीची जमीन सैन्याला देण्याचा पुढाकार घेतला असू ४० कोटींची देणगी दिली आहे.

दक्षिण मुंबईचे वयोवृद्ध समाजसेवक आणि राधा कलिंदस दरियानी ट्रस्टचे प्रमुख प्रेम दर्यानी यांनी पुन्हा एकदा मालकीची जमीन सैन्याला देण्याचा पुढाकार घेतला आहे. या भूमीवर, महाराष्ट्रातील प्रथम आणि देशातले द्वितीय आर्मी महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. सैन्य सेवेची आवड असलेल्या प्रेम दर्यानी यांनी ट्रस्टच्या माध्यमातून दुसऱ्यांदा हे दान केले आहे. प्रेम दर्यानिनी हे देशातील वैयक्तिक पातळीवर सैन्याला सर्वात मोठे वैयक्तिक देणगीदार म्हणून ओळखले जातात. मार्च २०१८ मध्ये त्यांनी पहिली देणगी दिली होती. ज्यात सहा तयार इमारती आणि सहा एकर जमीन होती. आता प्रेम पुन्हा सहा इमारती आणि दोन एकर जमीन देत आहे. ज्याची किंमत एकूण ४० कोटीच्या घरात आहे.

दरियानी ट्रस्ट ही देशातील मोठी देणगीदार

या जमीन आणि इमारतीमुळे आर्मीच्या महाविद्यालयाचा विस्तार होणार असून द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची संधी मिळणार आहे. देशात सैन्य लोकांसाठी फक्त दोन महाविद्यालये आहेत. पहिले मोहाली अनेक वर्षापूर्वी चंदीगडमध्ये बांधले गेले होते. तर दुसरे महाविद्यालय दर्यानी ट्रस्टच्या सहकार्याने पुण्याजवळील कान्हे गावात बांधले गेले होते आणि त्याचे यशस्वी एक वर्ष पूर्ण झाले आहे.

- Advertisement -

लेफ्टनंट जनरल यांना आतापर्यंत विशिष्ट सेवा पदक, युथ सेवा पदक आणि विशिष्ठ सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे. सदर्न कमांडचे अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. लेफ्टनंट जनरल सैनी यावेळी म्हणाले की, सैन्य देशासाठी सदैव तत्पर असते आणि अशा प्रकारे सैन्यात दान झाल्याने सैन्याचे मनोबल अनेक पटींनी वाढते. त्यांनी लष्कराला मदत केल्याबद्दल प्रेम दरियानी आणि ट्रस्टचे आभार मानले.  – एस.के. सैनी; दक्षिणी कमांडचे कमांडर-इन-चीफ लेफ्टनंट

देशाच्या बाह्य आणि अंतर्गत शत्रूंचा सामना करण्यासाठी आपल बलिदान देणाऱ्या भारतीय सैन्याबद्दल कृतज्ञता दर्शविणे हे या देणग्याचे मुख्य उद्दीष्ट आहे. भारतीय लष्कराचे जवान प्रत्येक धोक्याचा सामना करत सीमेवर नेहमीच सतर्क असतात. ते त्यांच्या जीवनावर पैज लावतात जेणेकरून आम्ही सुरक्षित राहू शकू. जेव्हा देशावर कोणत्याही नैसर्गिक किंवा मानवी आपत्तीचे संकट येते तेव्हादेखील ते मदत करण्यास सदैव तत्पर असतात.

- Advertisement -

आमच्या नागरिकांचीही त्यांच्यात योगदान देण्याची जबाबदारी आहे. या भावनेतूनच सर्वसामान्यांना याची जाणीव होण्याची वेळ आली आहे. सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत उभे राहणे आपले कर्तव्य आहे. प्रत्येक व्यक्तीची, वैयक्तिक असो की कॉर्पोरेट किंवा सामाजिक संघटनाची, भारतीय सैन्याशी जोडल्या गेलेल्या भावनेची आत्मसात करण्याचे बंधन आहे जेणे करुन सैन्याला विश्वास होईल की संपूर्ण देश त्याच्याबरोबर एकवटलेला आहे. – प्रेम दरियानी; दर्यानी ट्रस्टचे प्रमुख

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -