विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक पुस्तक लिहिलं आहे. काल हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘ असं या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडून राज्यसरकारला मिळालेल्या निधीचा लेखाजोखा मांडला आहे.
Book Launch | Join LIVE as we launch my book AatmaNirbhar Maharashtra, AatmaNirbhar Bharat on historic package & work done for Maharashtra by Hon PM @narendramodi ji https://t.co/a7AcuDWPUH
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 4, 2020
देवेंद्र फडणवीसांच्या या पुस्तकाचा काल प्रकाशन सोहळा पार पडला. याबाबतची माहिती फडणवीसांनी ट्विटद्वारे दिली. “आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत हे नवीन पुस्तक वाचकांपुढे सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. मराठी/हिंदी/इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. कोरोना काळात आपले पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी समाजातील सर्व घटकांना दिलासा देण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान जाहीर केले. त्याचा महाराष्ट्राला कसा लाभ होणार याचे सोप्या शब्दात यात विश्लेषण आहे,” असं ट्विट करत त्यांनी या पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती दिली.
हेही वाचा – भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना कोरोनाची लागण
या पुस्तक प्रकाशनाला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, विनोद तावडेजी, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या पुस्तकाला शब्दरुपी शुभेच्छाही दिल्या. या छोटेखानी कार्यक्रमाला तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.