घरCORONA UPDATEकोरोनाच्या संकटात राजकारण करू नका; रेल्वेमंत्र्यांना सल्ला

कोरोनाच्या संकटात राजकारण करू नका; रेल्वेमंत्र्यांना सल्ला

Subscribe

आपण महाराष्ट्राचे सुपुत्र आहात, याची आठवणही देशमुख यांनी करून दिली आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपण राजकारण करू नका, असा मित्रत्वाचा सल्ला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना दिला आहे. आपण महाराष्ट्राचे सुपुत्र आहात, याची आठवणही देशमुख यांनी करून दिली आहे. पश्चिम बंगालसाठी सोडण्यात आलेल्या विशेष श्रमिक रेल्वेगाड्यांबाबतचे गोयल यांचे हे विधान पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे. वस्तुस्थितीला धरून नाही, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

आम्ही महाराष्ट्रात गाड्या पाठवल्या. परंतु महाराष्ट्र सरकारने श्रमिकांना भरून त्या पश्चिम बंगालला पाठवल्या नाहीत, असे विधान गोयल यांनी केले आहे. यासंदर्भात खुलासा करताना अनिल देशमुख यांनी गोयल यांच्यावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली. पश्चिम बंगालचे मुख्य सचिव राजीव सिन्हा यांनी केंद्रीय रेल्वे प्रशासनाला २२ मे रोजी पत्र लिहून असे कळविले होते की, २६ मेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये कोणतीही रेल्वेगाडी पाठविण्यात येऊ नये. असे असतानाही रेल्वे प्रशासनाने त्या पत्राकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून महाराष्ट्राची फजिती व्हावी, तारांबळ उडावी, यासाठी ३४ गाड्या २६ मे रोजी महाराष्ट्रात पाठवल्या. ही महाराष्ट्राची फसवणूक आहे, असे देशमुख यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -