घरमहाराष्ट्रपाण्यासाठी माणकुळे ग्रामस्थांचे जागरण !

पाण्यासाठी माणकुळे ग्रामस्थांचे जागरण !

Subscribe

तालुक्यातील माणकुळे-शिरवली रस्त्याचे, तसेच पेयजल योजनेचे काम सुरू करण्यात यावे या मागणीसाठी माणकुळे परिसारातील ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हाधिकरी कार्यालयासमोर जागरण आणि गोंधळ आंदोलन केले.या रस्त्याच्या कामाची निविदा 4 जानेवारी 2017 रोजी काढण्यात आली होती. या रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. याबाबत सर्वाजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना भेटून चर्चा करण्यात आली, तसेच लेखी निवेदन दिले तरी रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही. याशिवाय 2 फेब्रुवारी 2018 रोजी 1 कोटी 22 लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री पेयजल पाणीपुरवठा योजनेतून माणकुळे पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर झाला होता. हे काम 11 ऑगस्ट 2019 पर्यंत पूर्ण करायचे होते. या कामाचीदेखील सुरूवात झालेली नाही.

याबाबत रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात लेखी पत्रव्यवहार करण्यात आला. परंतु त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. या दोन्ही कामांना सुरुवात करण्यात यावी या मागणीसाठी मंगळवारी ग्रामस्थांनी आंदोलन केले. सरपंच सुजित गावंड, उपसरपंच पल्लवी पाटील, चंद्रकांत पाटील, सुनील थळे, रवींद्र पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे, रेवसचे सरपंच मच्छिंद्र पाटील आदी यात सहभागी झाले होते. शेतकरी संघटनेचे बाबूभाई जैन यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. भाजपचे तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर, पंचायत समिती सदस्य उदय काठे, परशुराम म्हात्रे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -