घरCORONA UPDATEलॉकडाऊनचा फटका, खाद्याअभावी मुळा धरणातील मत्स्यपालन आले धोक्यात

लॉकडाऊनचा फटका, खाद्याअभावी मुळा धरणातील मत्स्यपालन आले धोक्यात

Subscribe

करोनाचा फटका राहुरीच्या मुळा धरणातील बंदिस्त मच्छिपालन व्यवसायाला बसला आहे. विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथून मच्छखाद्य आता राहुरीत पोहचणार नाही.

राजेंद्र वाडेकर, राहुरी

करोनाची महामारी रोखण्यासाठी सर्वच स्तरावर पाऊले टाकली जात आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून देशभरात त्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचा फटका राहुरीच्या मुळा धरणातील बंदिस्त मच्छिपालन व्यवसायाला बसला आहे. विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथून मच्छखाद्य आता राहुरीत पोहचणार नाही. करोनाच्या धास्तीने हे खाद्य आणण्यासाठी वाहतुकदार धजावत नसल्याने धरणाच्या पाण्यात तयार झालेल्या माश्यांचे जीव धोक्यात आले आहे.

- Advertisement -

मुळा धरणात मत्सपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी ५३ बंदीस्त पिंजरे (केज) लावण्यात आले असून यात अर्धाकिलोपासून ते दिड किलोपर्यतच्या वजनाचे मासे तयार झाले आहेत. या माश्यांना आवश्यक असणारे ग्रोवेल, कारगील, सिटी कंपनीचे खाद्य विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथून येते. विजयवाडा ते राहुरी मुळा धरणापर्यतच्या अंतरासाठी २३०० रुपये टनाप्रमाणे वाहतुक खर्च आकारला जातो. धरणात तयार झालेल्या चिलापी, चोपडा, कोंबडा या माश्यांना दैनंदिन पंधरा टन खाद्याची आवश्यकता असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मध्यरात्रीपासून देशभरात लॉकडाऊन लागु केले. त्यामुळे वाहनचालक, ट्रान्सपोर्ट मालक आपली वाहने रस्त्यावर आणण्यास धजावत नसल्याने याचा मोठा फटका आता मत्सव्यवसायाला बसणार आहे. करोनामुळे खाद्याची वाहतुक विस्कळीत झाली होती.

मंगळवारपर्यत पुरेल एवढेच खाद्य धरणातील मत्सपालन करणाऱ्यांकडे उपलब्ध होते. आता त्यांच्याकडील खाद्य संपल्याने बुधवारपासूनच खाद्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे माश्यांना खाद्य म्हणून बुधवारी पोह्यांचा वापर करण्यात आला. भविष्यात या माश्यांच्या वाढीसाठी पुरेसे खाद्य उपलब्ध झाले नाही तर त्यांची उपासमार होणार असून बंदीस्त पिंजऱ्यातील मत्स्यपालन धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. पंतप्रधानांच्या लॉकडाऊनचा फटका पहिल्याच दिवशी धरणातील लाखो माश्यांना बसला आहे.

- Advertisement -

व्यावसायिक सापडले आर्थिक अडचणीत

मुळा धरणातील पाण्यात बंदिस्त मच्छपालन (केज) हा व्यवसाय बेरोजगारांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा ठरला आहे. शासनाकडुन या व्यवसायासाठी ६० टक्के सबसिडी दिली जात असली तरी अद्याप पुरेशी सबसिडी मिळाली नसल्याने या व्यवसायीकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. एकीकडे ही अडचण उभी असतानाच दुसरीकडे मच्छखाद्य तुटवडा जाणवु लागल्याने व्यावसायिक सर्वबाजुने अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. – शरद बाचकर, संस्थापक, बाचकर फिशरीज.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -