कोकणात-मुंबईत जरी पाऊस पडत असला तरी अजूनही राज्यात लातूर आणि अमरावतीकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे यंदा तूर, उडिद आणि मूग डाळींच्या पिकावर त्याचा परिणाम झाल्याचे पहायला मिळत आहे. डाळींच्या उत्पादनातील २०.५४ लाख हेक्टर क्षेत्रामध्ये १४.४९ लाख हेक्टर क्षेत्रात विविध डाळींच्या पिकांची पेरणी झाली आहे. राज्यात १ जून ते १९ जुलैपर्यंत ३५२ मीमी म्हणजेच ७४.९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या एका अधिकाऱ्याने आपलं महानगरशी बोलताना सांगितले की, राज्यात उसाच्या पिकाला पकडून आता पर्यंत ७१ टक्के पेरणी झाली आहे.
सगळ्यात जास्त पेरणी कापसाची
दरम्यान, खरीप पिकांची १००.५७ लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली असून, राज्यात खरीप पिकांचे क्षेत्र १४०.६९ हेक्टर इतके आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यंदा कापसाची लागवड सर्वाधिक म्हणजेच ३७.२९ लाख हेक्टरमध्ये झाली असून, राज्यात कापसाच्या उत्पन्नाचे क्षेत्र ४१.९१ लाख हेक्टर इतके आहे. राज्यातील लातूर विभागात ६८ टक्के विविध पिकांची पेरणी झाली असून, अमरावतीमध्ये ८१ टक्के पेरणी झाली आहे.
नाशिकमध्येही कमी पावसाचा पिकांना फटका
मिळालेल्या माहितीनुसार नाशिक विभागात देखील कमी पावसाचा फटका बसला असून आतापर्यंत ७३ टक्के पेरणी झाली आहे. तर कोकणात ४४ टक्के पेरणी झाली आहे. दुसरीकडे पुण्यात ६३ टक्के पेरणी, कोल्हापूर विभागात ७१ टक्के पेरणी झाली आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस
अकोला, अमरावती, वर्धा आणि धुळे या चार जिल्ह्यात २५ ते ५० टक्के पाऊस झाला आहे. तर नागपूर, औरंगाबाद, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपुर, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, नाशिक, नंदूरबार, जळगाव, सोलापुरमध्ये ५० ते ७५ टक्के पाऊस आणि बुलढाणा, अहमदनगर, कोल्हापुर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७५ से १०० टक्के पावसाची नोंद झाली आहे.
अशी झाली विभागवार पेरणी
विभाग हेक्टर क्षेत्र टक्केवारी
अमरावती २६.१० लाख हेक्टर ८१
नागपुर ११.२२ लाख हेक्टर ५९
औरंगाबाद १६.४२ लाख हेक्टर ८१
लातूर विभाग १८.९० लाख हेक्टर ६८
नाशिक विभाग १५.५८ लाख हेक्टर ७३
कोल्हापुर विभाग ५.८२ लाख हेक्टर ७१
पुणे विभाग ४.५० लाख हेक्टर ६३
कोकण १५.५८ लाख हेक्टर ७३