घरमहाराष्ट्रदेशात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात

देशात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात

Subscribe

राज्यातील तत्कालीन भाजप सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी नंतरही राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र थांबलेलं नाही आहे. देशात २०१९ मध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या या महाराष्ट्रात आहेत. NCBR ने २०१९ मधील २०१९ मधील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीने महाराष्ट्राच्या चिंतेत भर टाकली आहे.

देशात २०१९ या वर्षात दहा हजार २८१ शेतकऱ्यांनी जीवन संपवलं आहे. देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांच्या क्रमवारीत दुर्वैवानं महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. कर्जमाफी करणार असल्याचं जाहीर करुन देखील शेतकरी आत्महत्या थांबल्या नाही आहेत. महाराष्ट्रात ३ हजार ९२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

- Advertisement -

“महाराष्ट्र राज्य कृषी सुधारणांना चालना देण्यात आघाडीवर आहे. २००६ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारच्या काळात राज्यात कंत्राटी शेतीसह इतर शेतीविषयक सुधारणांची अंमलबजावणी करण्यात आली होती. असं असलं तरी देखील राज्यातील १.५६ कोटी शेतकऱ्यांपैकी ५० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कंत्राटी शेतीचा लाभ घेतलेला नाही,” असं कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनं सांगितलं. “आघाडी सरकारनंतर सत्तेत आलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारनेही गट शेतीवर भर दिला. आर्थिक प्रोत्साहन १ कोटी रूपयांपर्यंत वाढवलं,” असंही अधिकाऱ्यांनं सांगितलं.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने ८९ लाख शेतकऱ्यांसाठी ३५ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. मात्र, या कर्जमाफीनंतरही राज्यातील शेतकरी आत्महत्या कमी झाल्या नसल्याचं NCBR ची आकडेवारी सांगते. राज्यात २०१४, २०१५, २०१६ आणि २०१९मध्ये ३ हजार ५०० पेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं आकडेवारीतून दिसून आलं आहे. २०१७ व २०१८ या वर्षातील शेतकरी आत्महत्यांची एनसीआरबीनं नोंद केलेली नाही.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -