सनातन कार्यकर्त्यांच्या अटकेनंतर शिवसेनेने भाजपवर पहिल्यांदाच निशाणा साधला आहे. हिंदू आतंकवाद हा शब्द कॉंग्रेसच्या काळात ऐकत होतो. मात्र हा शब्द जर मोदी सरकारमध्ये पुन्हा उसळी मारत असेल तर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संघ परिवाराचे दुर्दैव असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मोदी राजवटीमध्ये हिंदू आतंकवाद हा शब्द पुन्हा ऐकण्यात येत असल्याने हे देशाचे दुर्दैव म्हणावे असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. त्याचबरोबर हिंदुत्वासाठी लढणाऱ्या, शहिद होणाऱ्या लाखो हिदुत्वावाद्याचं दुर्दैव असल्याचे देखील ते म्हणाले.
पाहा काय म्हणाले संजय राऊत हिंदू दहशतवाद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल!!! @RahulGandhi @INCIndia @rahul_gandhi927 @NCPspeaks @mnsadhikrut pic.twitter.com/isWGo88tOZ
— My Mahanagar (@mymahanagar) August 27, 2018
वाचा – ते संशयित अतिरेकी आमचे सदस्य नाहीत; सनातनचे घुमजाव