उत्तर प्रदेशमध्ये चकमकीदरम्यान पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यामध्ये आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यावरुन आता राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनावरुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं कौतुक करणाऱ्या महाराष्ट्र भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. वर्ल्ड बेस्ट सीएमचे गुणगान गाणारे इथले भाजपाई आता गुळणी धरून बसले आहेत, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
उत्तर प्रदेशात चकमकीदरम्यान आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये पोलीस उपअधीक्षकाचाही समावेश आहे. कानपूर येथे पोलीस विकास दुबे या गुंडाला अटक करण्यासाठी गेली असता ही चकमक उडाली. विकास दुबे याच्यावर ६० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलीस बिकरु गावात विकास दुबेच्या शोधात गेली असता गुंडांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी आदित्यनाथांचं कौतुक करणाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. “उत्तर प्रदेश मध्ये आज गुंडांनी ८ पोलिसांना गोळीबार करून मारले. वर्ल्ड बेस्ट सीएमचे गुणगान गाणारे इथले भाजपाई आणि मराठी भैय्ये आता गुळणी धरून बसले आहेत,” अशी टीका केली आहे. शिवाय त्यांनी हॅशटॅग गुंडाराज असंही म्हटलं आहे.
उत्तर प्रदेश मध्ये आज गुंडांनी ८ पोलिसांना गोळीबार करून मारले.
वर्ल्ड बेस्ट सीएमचे गुणगान गाणारे इथले भाजपाई आणि मराठी भैय्ये आता गुळणी धरून बसले आहेत.#YogiAdityanath #योगी#गुंडाराज— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 3, 2020
हेही वाचा – ओबीसी आरक्षणासंदर्भात सोनिया गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र