घरमहाराष्ट्रकमी पावसामुळे शेतीसाठी सूक्ष्म सिंचन अनिवार्य

कमी पावसामुळे शेतीसाठी सूक्ष्म सिंचन अनिवार्य

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

बदलत्या हवामानामुळे पर्जन्यमानात अनियमितता आली असून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य विनियोग करणे ही काळाची गरज बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतजमिनीची सुपीकता टिकवून ठेवत कमी पाण्याचा वापर करून चांगल्या प्रतीच्या आणि अधिक उत्पादन देणार्‍या पिकांसाठी सूक्ष्म सिंचन अनिवार्य आहे. शाश्वत शेतीचा हा उत्कृष्ट पर्याय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले.

केंद्र शासनाच्यावतीने अजंता अम्बेसेडर येथे तीन दिवसीय नवव्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रस्ते वाहतूक, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा संरक्षण खात्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, कर्नाटकचे कृषीमंत्री डी. के. शिवकुमार, केंद्रीय मानव संसाधनमंत्री डॉ. सत्यपाल सिंग, सत्येंद्र जैन, यु. के. सिंग, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, अनुप मिश्रा, आर. के. गुप्ता यांच्यासह हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गोवा, उत्तर प्रदेश, हरियाणा राज्याचे कृषीमंत्री, मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

मुख्यमंत्री म्हणाले, कृषी क्षेत्राचा कायापालट घडवून आणण्याची क्षमता ही सूक्ष्म सिंचनात आहे. त्याचा व्यापक प्रमाणात सर्व शेतकर्‍यांनी स्वीकार करणे आवश्यक आहे. या प्रभावी संकल्पनेचा व्यापक प्रसार, प्रचार करणारी, त्यातील अद्ययावत तंत्रज्ञान, माहितीचे अदान-प्रदान करणारी ही आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद प्रथमच आपल्या देशात त्यातही महाराष्ट्रात होत आहे. याचा आपल्याला विशेष आनंद होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या पाण्याच्या उपलब्धतेच्या अनुषंगाने सर्वांनीच दक्षतापूर्वक पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा वापर केला पाहिजे. बदलत्या हवामानामुळे पावसाचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. या अनियमिततेत स्थिरतापूर्वक शेती करणे हे आव्हान आपल्या देशासह जगभरातील शेतकर्‍यांसमोर उभे ठाकले आहे. त्यादृष्टीने कमी पाण्यात अधिक उत्पन्नाची हमी देणार्‍या सूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची बचत आणि जमिनीचा कस टिकवून ठेवणे शक्य होते. त्यामुळे सूक्ष्म सिंचनाचा वापर करताना अद्ययावत तंत्रज्ञानाचा स्वीकार करून अल्पभूधारक शेतकर्‍यांपासून सर्वच शेतकर्‍यांनी शेतीसाठी सूक्ष्म सिंचन पद्धती वापरणे हे शाश्वत शेतीच्या प्रगतीसाठी आवश्यक बाब आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, देशात सर्वत्र पाणीटंचाईच्या प्रश्नामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीतून यशस्वीरित्या बाहेर पडण्यासाठी आमच्या विभागाने सिंचनाला प्रथम प्राधान्य दिले आहे. ठिबक, सूक्ष्म सिंचन हा पाण्याचा कमीत कमी वापर करून चांगले उत्पादन करण्याचा योग्य पर्याय आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांनी देशात चांगले काम केलेले आहे. बंदिस्त पाईपद्वारे पाणीपुरवठ्याची योजना या दोन्ही राज्यांनी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टळणार आहे. सिंचन ही शेती क्षेत्राच्या प्रगतीसाठी महत्त्वाची बाब असून त्यादृष्टीने पंतप्रधानांनी विविध कार्यक्रमांतर्गत राज्यामधील अर्धवट प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच केंद्र सरकारने देशातील राज्यांना सिंचन प्रकल्पासाठी अर्थसहाय्य दिले आहे. त्याच प्रमाणे नद्याजोड प्रकल्पासाठीदेखील केंद्र शासन मोठा निधी देत आहे.

- Advertisement -

मराठवाड्यात पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी दमणगंगा-पिंजर नदीजोड प्रकल्पाचे पाणी जायकवाडीमध्ये आणण्यात येणार असून या नदीजोड प्रकल्पातील चांगली मदत होणार असून यामुळे जायकवाडी धरणातील 35-40 टक्के पाणीसाठ्यात वाढ होऊन 80 ते 90 टक्के पाणीसाठा निर्माण होईल. त्यामुळे गोदावरी खोर्‍याच्या मराठवाडा क्षेत्रातील लोकांना पाणी मिळेल. तसेच तापी नर्मदा नदीजोड प्रकल्प देखील राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -