घरताज्या घडामोडी'कंगनाने मुंबईत येऊन शिवसेनेचं नाक कापलं', राणेंचा हल्ला

‘कंगनाने मुंबईत येऊन शिवसेनेचं नाक कापलं’, राणेंचा हल्ला

Subscribe

पुढील अधिवेशन घेण्याची वेळ आलीच तर अडीच तासाचे अधिवेशन मातोश्रीच्या गच्चीवर घ्या', असे म्हणत भाजप नेते नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला केला आहे.

‘बोल्याप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री कंगना मुंबईत दाखल झाली. तिच्या घरी देखील गेली. तिने प्रतिक्रियाही दिली आणि शिवसेनेचं नाक कापलं. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था आहे का? हा माझा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे. कंगना जर मुंबई महाराष्ट्राचा अपमान करत असेल, तर कायद्यात तरतूद आहे, कारवाई करा. मुख्यमंत्री मातोश्रीच्या पिंजऱ्यात कशाला बसलाय,’ अशी खोचक टीका भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.

‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन घेण्यात आले. मात्र, जे अधिवेश घेण्यात आले होते. त्या अधिवेशनाला काहीही अर्थ नव्हता. या अधिवेशनात आरक्षणासह इतर महत्त्वाचे मुद्दे घेण्यात आलेले नाही. त्यामुळे घेण्यात आलेले अधिवेशन पटलेले नसून हे अधिवेशन घेतले नसते तरी चालेल असते. त्यामुळे पुढील अधिवेशन घेण्याची वेळ आलीच तर अडीच तासाचे अधिवेशन मातोश्रीच्या गच्चीवर घ्या’, असे म्हणत भाजप नेते नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला केला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले नारायण राणे?

‘राज्य सरकार हे मराठा आरक्षण देण्याच्या मानसिक स्थितीत नव्हतं. त्यामुळेच त्यांनी सुप्रीम कोर्टात नामांकित वकील दिले नाहीत. राज्य सरकारने नात्या-गोत्यातले साधे वकील उभे केले. चांगला वकील सुप्रीम कोर्टात दिला नाही, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली यासाठी सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे,’ अशी टीका नारायण राणे यांनी केली. त्यामुळे दोन दिवसीय घेण्यात आलेले अधिवेशन पटलेल नाही. त्यामुळे हे अधिवेशन घेतले नसते तरी चाले असते. त्यामुळे पुढील अधिवेशन घेण्याची वेळ आलीच तर अडीच तासाचे अधिवेशन मातोश्रीच्या गच्चीवर घ्या’, असे म्हणत नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

हात धुणे अशा सूचना मुख्यमंत्री देतात

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना या महामारीविषयी न बोलता सातत्याने हात धुवा असे सल्ले देतात. गेल्या तीन महिन्यांपासून तेच सल्ले देत आले आहेत. त्यामुळे आता असे सल्ले न देता. महत्त्वाच्या विषयांवर बोलणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता मुख्यमंत्री कोरोनाची आकडेवारी सांगत होते. त्यामुळे आता तरी गांभीर्याने हा विषय हाताळणे गरजेचे असून महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणे अपेक्षित आहे’, असा सल्ला नारायण राणे यांनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपच्या माजी आमदाराचा राष्ट्रवादीत प्रवेश


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -