नाशिक-मुंबई महामार्गावर संध्याकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहापूरजवळ हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये तवेरा गाडीचा अक्षरश: चुराडा झाला. भंवर कुटुंबीय एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी तवेरा गाडीने ठाण्याला चालले होते. मात्र, शहापूरजवळ तवेरा गाडीचे टायर फुटल्याने तवेरा गाडी समोरच्या आयशर गाडीवर जाऊन आदळली. या अपघातात सातपूर कॉलनीतील रहिवासी तथा मायको कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी प्रकाश दत्तात्रय भंवर (वय ७०),त्यांची भावजई संगीता राजेंद्र भंवर (वय ४७), चुलत भाऊ आणि नाशिकरोड येथील रहिवासी बाळासाहेब भंवर (वय ६०) आणि चुलत बहीण सुमन ठोके (वय ५३) रा. सिडको या चौघांचा मृत्यू झाला. याशिवाय इतर चार जण जखमी असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -