शहर वाहतूक शाखेतर्फे २६ ते ३१ ऑगस्टपर्यंत विशेष मोहिमेअंतर्गत विनाहेल्मेट व विनासीटबेल्ट वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी वाहतूक शाखेकडून जनजागृती केली जात आहे.
शहर पोलिसांकडून सातत्याने जनजागृती केली जात असल्यामुळे वाहनधारकांमध्ये वाहतूक नियमांचे प्रमाण वाढले आहे. वाहनचालकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेट व सीटबेल्टचा नियमितपणे वापर करावा, ट्रिपल सीट, धोकादायक पद्धतीने वाहन चालवू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले आहे.