घरताज्या घडामोडीपाणीपूरवठा योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करा

पाणीपूरवठा योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करा

Subscribe

जिल्हयातील पाणी पूरवठा योजनांचा भुजबळ, पाटील यांनी घेतला आढावा

नाशिक जिल्ह्यातील लासलगांव-विंचूर सह. 16 गांवे, धुळगाव(भिंगारे ता. येवला) व 17 गावे, राजापूर व 40 गांवे , नांदूर मध्यमेश्वर, खडकमाळेगांव व सारोळे या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना नाशिक जिल्ह्यातील इतर पाणी पुरवठा योजनांचा आढावा नाशिक जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयात घेतला. यावेळी अपूर्ण पाणीपूरवठा योजनांची कामे पूर्ण करण्योच आदेश पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले

यावेळी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, नाशिक जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. जिल्ह्यातील प्रलंबित पाणी पुरवठा योजनांचा विभागाच्या अधिकार्‍यांनी आढावा सादर करावा. लासलगांव-विंचूर हे गाव मोठ्या बाजारपेठेचे गाव असून येथील पाणी पुरवठा सुरळीत ठेवणे महत्वाचे आहे. त्यादृष्टीने लासलगांव-विंचूर सह 16 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीच्या कामाला मंजूरी देण्यात यावी, भिंगारेसह 15 गांवे, राजापूर व 40 गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा नव्याने प्रस्ताव मान्य करावा. निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर, खडकमाळेगांव व सारोळे खु. येथील पाणी पुरवठा योजनांचा जलजीवन मिशन कृती आराखडयात समावेश करावा . तसेच जिल्ह्यातील गावांच्या पाणी पुरवठा योजनांची गरजेनुसार कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करावीत अशा सूचना भुजबळ यांनी दिल्या. बैठकीस पाणी पुरवठा विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर, तसेच पाणीपुरवठा विभागाचे मंत्रालय व नाशिक जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -