घरमहाराष्ट्रनाशिकवावीमधील पहिला सौर कृषी वाहिनी पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित

वावीमधील पहिला सौर कृषी वाहिनी पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित

Subscribe

शेतकर्‍यांना दिवसा अखंडित, सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी राबवल्या जाणार्‍या सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत जिल्ह्यात १९ ठिकाणी १०२ मेगावॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्या अंतर्गत सिन्नरच्या वावी येथील पहिल्या अर्धा मेगावॅट क्षमतेच्या पथदर्शी प्रकल्पात प्रत्यक्षात वीज निर्मिती सुरू झाली आहे.

कृषी पंपांना अर्थात शेतीला रात्री वीज दिली जात असल्याने शेतकर्‍यांना रात्री बेरात्री पिकांना पाणी देण्याची कसरत करावी लागते. शेतीसाठी जेमतेम आठ ते दहा तास वीज मिळते. त्यात अंधारात करावा लागणारा द्राविडी प्राणायाम शेतकर्‍यांची परीक्षा पाहणारा ठरतो. ही बाब लक्षात घेऊन शेतकर्‍यांना दिवसा अखंडित, सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी राबवल्या जाणार्‍या सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत जिल्ह्यात १९ ठिकाणी १०२ मेगावॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्या अंतर्गत सिन्नरच्या वावी येथील पहिल्या अर्धा मेगावॅट क्षमतेच्या पथदर्शी प्रकल्पात प्रत्यक्षात वीज निर्मिती सुरू झाली आहे.

महावितरणच्या वीज पुरवठ्याच्या शेतीपंपांना दुय्यमस्थान दिले जाते. राज्यात अतिरिक्त वीज उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्र भारनियमनमुक्त झाल्याची घोषणा होते; परंतु शेतीला दिवसा वीजपुरवठा केला जात नाही. यंदा पावसाने पाठ फिरवल्याने पिकांचे भवितव्य विहिरीतील पाण्यावर अवलंबून आहे. त्यात महावितरणच्या कार्यपद्धतीमुळे शेतकर्‍यांना शेतात रात्र जागून काढावी लागत असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. विद्युत रोहित्र नादुरुस्त झाले तरी त्याची दुरुस्ती लवकर होत नाही. त्यासाठी वीज कंपनीचे कर्मचारी पैसे मागत असल्याच्या तक्रारी केल्या जातात. कृषी पंपधारकांकडे मोठी रक्कम थकीत आहे. त्याची वसुली व्हावी म्हणून व्याज, दंडातून माफीच्या योजना आणल्या गेल्या. तरीही थकबाकीचे प्रमाण फारसे कमी झाले नाही. शेतीला दिली जाणारी वीज आणि खरेदी केली जाणारी वीज यातील तफावत सौर कृषी वाहिनी योजनेतून कमी होणार आहे. शेतकर्‍यांना दिवसा अखंडित, सुरळीत वीज मिळावी या हेतूने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविली जात आहे. त्याअंतर्गत उपकेंद्राच्या ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रस्तावित आहे.

- Advertisement -

या उपकेंद्रातून शेतीला वीज पुरवठा करण्यासाठी स्वतंत्रपणे सौर वीज वाहिनी उभारण्याचे नियोजन आहे. अपारंपरिक स्त्रोत्रातून उपलब्ध होणारी हरित ऊर्जा कायमस्वरुपी आणि कमी खर्चिक आहे. त्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध होणार असल्याने शेतकर्‍यांना रात्री-बेरात्री शेतात जावे लागणार नाही. नाशिक जिल्ह्यात सरकारी, गायरान तसेच महावितरणच्या जागेत १९ ठिकाणी १०२ मेगावॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी दिली.

वावी येथील प्रकल्प कार्यान्वित

या योजनेतील पहिल्या प्रकल्पाची सिन्नर तालुक्यातील वावी येथे मुहूर्तमेढ रोवली आहे. अर्धा मेगावॉट क्षमतेच्या या प्रकल्पातून वीज निर्मितीला सुरूवात झाली आहे. पुढील काळात अशा प्रकल्पाचे जाळे विस्तारले जाणार आहे.जितक्या भागात विस्तारले जाईल, तितक्या भागात शेतकर्‍यांना दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होणार असल्याचे महावितरणचे अधिकारी सांगतात.

- Advertisement -

या ठिकाणी प्रकल्प प्रस्तावित

गिरणारे, वणी, लासलगांव, वडांगळी, वडगाव पंगु, वडाळीभोई, वडनेर भैरव, विंचूर, म्हर्‍हळ बुद्रुक, मीठसागरे, पंचाळे, निगडोळ, कोशिंबे, वारे, हस्ते दुमाला, पिंपरी अंचला, शाह, आणि सुरगाणा येथे दोन ठिकाणी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -